येत्या निवडणुकीत मराठा समाज काँग्रेसविरोधात भूमिका घेणार !

काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणासाठी विरोध करत आहेत. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा मराठा समाजाच्या मतपेढीस निवडणुकांमध्ये काँग्रेसला मुकावे लागेल !

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ! – विश्वास नांगरे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल.

३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडवा हाच खरा हिंदूंचा नववर्षारंभ ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर 

हिंदु कालगणनेकडे दुर्लक्ष करून आपण आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतो. असे करणे म्हणजे अजुनही आपण इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीत जगत आहोत.

पर्यटकांच्या दायित्त्वशून्य वागण्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कलंबिस्त मळा येथे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

धर्मांधांनी भारतावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे ! इस्लामी राज्य दूरच, उलट कालमहात्म्याप्रमाणे भारतात सात्त्विक आणि सज्जन व्यक्तींचे हिंदु राष्ट्र स्थापन होणार असल्याचे त्यांनी जाणावे, यातच अख्तर यांच्यासारख्यांचे भले आहे !

इंग्लंड येथून आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक करा ! – रोहन खंवटे, आमदार

काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ब्रेग्झिटचे पडसाद !

ब्रेग्झिट ही युरोपीय देशांसाठी चिंतेची गोष्ट असली, तरी भारताला पारतंत्र्यातील अन्यायाच्या जखमा भरण्यासाठी नियतीने दिलेली मोठी संधी आहे. युरोपीय देशांवर आलेला हा नियतीचा फेरा आहे. त्यांनी जी कर्मे केली, त्यांची फळे ते आज या समस्यांच्या रूपातून भोगत आहेत !

भगवद्गीतेतील मार्गदर्शन आजही उपयुक्त ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

तणावपूर्ण जीवनशैलीमधून बाहेर येण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेले मार्गदर्शन आजही तेवढेच उपयुक्त आहे. सध्याची समाजव्यवस्था  व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करणारी आहे.

पाकने क्षमा मागावी ! – आस्थापनाची मागणी

तुर्कस्तानचे आस्थापन अल्बायर्क अँड ओज्पॅक ग्रुपच्या कार्यालयावर काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून धाड टाकण्यात आली होती. पोलिसांनी आस्थापनाच्या काही कर्मचार्‍यांना कह्यात घेऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

अयोग्य पद्धतीने वापर होत असलेल्या देवस्थानांच्या भूमी कह्यात न घेतल्यास उपोषण करणार !

हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान आणि तुळजापूरचे श्री भवानीमातेचे देवस्थान यांच्या भूमीविक्रीच्या, दागिन्यांच्या आदी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यावर त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली आहे.