भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गोहत्याबंदी आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक यांची मागणी !

गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली.

धर्मादाय कार्यालयातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ! – आयुक्त

कोरोनामुळे धर्मादाय आयुक्तालयातील अनिर्णित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज चालू करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद

कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी देहलीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. आंदोलकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला .

(म्हणे) ‘आंदोलनामध्ये बळाचा वापर करून ती दडपणे चुकीचे !’

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन सरकारने कुठेही दडपलेले नाही, उलट त्यांच्याशी आतापर्यंत ५ फेर्‍यांची चर्चा झालेली आहे. तरीही भारताची अपकीर्ती करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्‍चात्त्य देश जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे !

८ डिसेंबरच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्रीतून म.फि. हुसेन यांची चित्रे वगळली !

हिंदूंनी वैध मार्गाने संघटितपणे विरोध केल्यास यश मिळते याचे हे आणखी एक उदाहरण ! याविषयी हिंदूंनी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी !

‘फायझर’ने भारताकडे मागितली कोरोनावरील लसीची विक्री करण्याची अनुमती !

अशी मागणी करणारे ‘फायझर’ हे पहिले औषधनिर्मिती करणारे आस्थापन ठरले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश सरकारने तसेच बहारीनमध्येही ही लस वापरण्यास संमती देण्यात आली आहे.

गेल्या ११ मासांत काश्मीरमध्ये २११ आतंकवादी ठार : ४७ जणांना अटक

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी पाकमध्ये त्यांची घाऊक निर्मिती चालू आहे. हे पहाता येथील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले पाहिजे !

गोवा आणि बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी ‘पी.एफ्.आय.’कडून लावण्यात आली बाबरी ढाचा पुन्हा उभारण्याविषयीची भित्तीपत्रके !

पी.एफ्.आय.चा अनेक देशविरोधी आणि हिंदुविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असतांना केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्यासाठी कुणाची वाट पहात आहे ?