आमदारांची बैठक घेऊन केंद्रशासनाकडे पाठपुरावा करणार ! – मंत्री शंभुराज देसाई

काही ठिकाणी विकासकामे करण्यात अडचणी येत आहेत. हा प्रश्न केंद्रशासनाशी संबंधित असल्याने आणि पुष्कळ काळ प्रलंबित असल्याने संबंधित आमदारांनी त्यांची पत्रे, निवेदने मला द्यावीत. या आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, असे उत्तर पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर दिले.

शिवसागर जलाशयातील तराफा सेवा चालू !

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाण्याने तळ गाठला होता. यानंतर गत ३ महिन्यांपासून ‘तराफा सेवा’ (जलाशयातून वाहतूक करण्याची सेवा) बंद ठेवण्यात आली होती. मेपासून चांगला पाऊस झाल्याने कोयना धरण ७० टक्क्यांच्या वर भरले आहे. त्यामुळे १४ जुलैपासून शिवसागर जलाशयातील तराफा सेवा चालू करण्यात आली आहे.

राजगड, तोरणागड येथे जाण्यास पर्यटकांना मनाई नाही ! 

पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये यासाठी राजगड, तोरणा या गडांसह पानशेत, वरसगाव धरण परिसर, मढे घाट धबधबा, तसेच राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवरील धोकादायक ठिकाणी जाण्यास, तसेच क्रीडा करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे; मात्र गडकोटांसह पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई नाही, अशी माहिती राजगड तालुका प्रशासनाने दिली आहे.

कळंगुट येथे यापुढे नवीन ‘स्पा’ केंद्राला अनुमती नाही ! – कळंगुट पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव

अनधिकृत धंद्यांना प्रोत्साहन देणारी ‘स्पा’ केंद्रे बंद करणार्‍या आणि नवीन ‘स्पा’ केंद्राला अनुमती न देण्याचा निर्णय घेणार्‍या कळंगुटवासियांचे अभिनंदन !

चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करणार ! –  सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले 

या पुलाचे आयुष्य संपले होते. सदरचा पूल धोकादायक असून तो वापरण्यास मनाई करण्यात आली आहे, असे फलक लावले होते.

चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करणार ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील ‘कुंडमळा’ येथील पूल १५ जून या दिवशी कोसळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पुलाच्या कामाचा कार्यादेश का निघाला नाही ? त्यास विलंब का झाला ? या प्रकरणी ३ सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दिरंगाई, कर्तव्यामध्ये कसूर करणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल.

Jaishankar Nuclear Threat : भारत अणूबाँबच्या धमकीला घाबरत नाही !

‘दोन्ही देश अणूशक्तीशाली आहेत आणि म्हणून भारताने संयम बाळगला पाहिजे’, अशी भीती दाखवण्याची वेळ आता संपली आहे.

वेद, होम-हवन अभ्यासक्रम चालू करण्याची मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा !

नाशिक- त्र्यंबकेश्व येथे होणार्‍या कुंभपर्वात पर्यटनासह अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाची संधी आहे. त्यातही योग्य पुरोहितांची आवश्यकता लक्षात घेता अल्प मुदतीचा ‘वेद, होम-हवन’ अभ्यासक्रम चालू करण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली.

 अपघातांची संख्या आणखी न्यून करण्यासाठी जनजागृतीसमवेत ‘ब्रेथनालायझर’द्वारेही तपासणी करावी ! – खासदार सुनील तटकरे

परशुराम घाटामध्ये दरडी कोसळून होणार्‍या अपघातांविषयी विशेष लक्ष केंद्रित करावे. त्याविषयीच्या तांत्रिक उणिवा दूर कराव्यात.

‘सी प्लेन’ सेवेसाठी धोम धरणाच्या जलाशयाची निवड !

केंद्रशासनाच्या या निर्णयामुळे महाबळेश्वर तापोळ्या पाठोपाठ धोम धरण परिसरातही पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.