
पणजी – राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुट समुद्रकिनार्यावर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांमध्ये कोरोनाविषयी कोणतीही भीती राहिलेली नाही, असे चित्र दिसत आहे.
इंग्लंड येथे कोरोनाचा नवीन विषाणू सापडला आहे आणि इंग्लंड येथून पर्यटक गोव्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा अथवा कोरोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग गोव्यात होऊ नये, यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न चालू असतांना पर्यटकांचे दायित्वशून्य वागणे चिंता वाढवणारे ठरत असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण