जे चांगले-वाईट घडते, ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठीच घडवतो’, असा भाव मनाशी हवा ! – पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे

‘जे चांगले-वाईट घडते, ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठीच घडवतो’, असा भाव मनाशी ठाम झाला, तरच सर्व काही सुसह्य होऊन जीवनात आनंद घेता येईल आणि दुसर्‍यांनाही आनंद वाटता येईल.

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह !

स्वर्ग नाकारणारे महर्षि मुद्गल !

एखाद्या सर्पाला न मारता केवळ त्याचे दात काढून गळ्यात मिरवले, तर तो बाधक ठरणार नाही. अशा प्रकारे विकारांना नष्ट न करता त्यांचा प्रभाव अल्प केला पाहिजे.

समुद्र प्राशन करणारे महर्षि अगस्ति

हिमालय आणि विंध्य यांच्या मधल्या भूभागातील सर्व ज्ञान आणि पुण्य जर तराजूच्या एका पारड्यात टाकले आणि अगस्ति ऋषींना दुसर्‍या पारड्यात बसवले, तर अगस्ति ऋषींचेच पारडे जड होईल.

अष्टावक्र गीतेचे रचयिते ऋषि अष्टावक्र !

अष्टावक्राला प्राचीन काळातील एका महान ऋषींचा दर्जा मिळाला. त्याने राजा जनकाला सांगितले तत्त्वज्ञान आणि अष्टावक्र गीता या नावाने ग्रंथबद्ध झालेले आढळते.

महर्षि आस्तिक

माणसाने प्राण्यांवर आणि निसर्गातील घटकांवर दोषारोपण करण्याऐवजी स्वतःतील दोष काढून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे.’

निस्वार्थ हेतू, दूरदृष्टी असलेले आणि विरक्त जीवन जगलेले ऋषि दुर्वास !

मृत्यूच्या देवाचे शंकराचे अंश, म्हणजे दुर्वास. त्यामुळे दुर्वासांचे व्यक्तीमत्त्व एकांतप्रिय, विजनवासी, कोपिष्ट असे होते.

सांख्य दर्शनाचे प्रवर्तक महर्षि कपिल !

सांख्यदर्शन हे भारतीय षड्दर्शनांपैकी एक दर्शन आहे. या दर्शनाची मांडणी म्हणजे विश्व विकासाची भौतिक दृष्टीकोनातून मीमांसा करण्याचा पहिलाच भव्य आणि तर्कनिष्ठ प्रयत्न आहे.

भारताला कोणत्या प्रकारचे शिक्षण आवश्यक आहे ?

‘ज्या दिवसापासून शिक्षण, सभ्यता, प्रभृति गोष्टी हळूहळू वरच्या जातींतून खालच्या जातींत पसरू लागल्या, त्या दिवसापासूनच पाश्चात्त्य देशांची ‘आधुनिक सभ्यता’ आणि भारत, इजिप्त, रोम इत्यादी देशांची ‘प्राचीन सभ्यता’ यांच्यात भेद पडू लागला.’

निसर्गाला संपवून माणूस सुखी होणार नाही ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज

प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, ‘‘माणूस बुद्धीमान आहे. तो नित्य नवे शिकत असतो; मात्र जीवन जगण्याची खरी कला माणसाला अवगत नाही. आपण भूमातेला आई म्हणतो. तिच्या उदरामध्ये विविध पिके घेतो. ही माती माणसाला जिवंत ठेवते; परंतु या मातीसाठी आपण काय करतो ?