हरभरा उत्पादनवृद्धीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांनी आत्मसात करावे ! – मुकुंद म्हेत्रे

शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात हरभरासारख्या पिकासाठी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. यामुळे हरभर्‍याचे उत्पन्न ३० ते ४० प्रतिशत वाढून शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वृद्धी होईल, असा विश्‍वास कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी व्यक्त केला.

गुरुकृपायोगानुसार साधना ही ज्ञानयोग-भक्तीयोग-कर्मयोग यांचा अपूर्व संगम ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

आजचा सत्संग सोहळा भावस्पर्शी होता. साधनेच्या अनुभवाचे बोल ऐकून आत्मिक आनंद मिळाला. संतांच्या संगतीत राहून अमृताचा वर्षाव झाल्यासारखे वाटले. ‘गुरुकृपेने झाले साधक गोळा । संपन्न झाला सत्संग सोहळा ॥’

कोल्हापुरात आता ‘आरटी-पीसीआर’ चाचणी केवळ ७०० रुपयांमध्ये

खासगी प्रयोगशाळांनी कोरोनाची चाचणी आता केवळ ७०० रुपयांमध्ये करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. तिसर्‍यांदा ही दरआकारणी अल्प करण्यात आली आहे.

पुणे येथे ‘प्लाझ्मा’ बॅगच्या किमतींमध्ये तफावत !

आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा त्रास रुग्णांना होतोे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णांची होणारी आर्थिक फसवणूक टाळावी !

शिर्डी संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली घोषित !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी संस्थानने नाताळच्या निमित्ताने साई दर्शनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.

२६ डिसेंबरला शिवसेनेची सांगली-तुळजापूर १६ वी आशीर्वाद यात्रा ! – हरिदास पडळकर, शिवसेना

ही यात्रा २६ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता सांगली येथील शिवतीर्थ, मारुति चौक येथून प्रारंभ होईल, अशी माहिती या यात्रेचे प्रमुख निमंत्रक आणि शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांनी दिली.

नेर्ली (जिल्हा सांगली) येथे आढळला सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख ! – मिरज इतिहास मंडळाचे संशोधन

सांगली जिल्ह्यातील नेर्ली (तालुका कडेगाव) येथे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख आढळला आहे. मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा लेख शोधला आहे.

तृणमूल काँग्रेसविरुद्ध आणि भाजपला मत दिले, तर रक्ताचे पाट वहातील ! – बंगालमध्ये भिंतीवर धमकी !

बंगालमध्ये लोकशाहीचे तीनतेरा वाजवण्यात आले आहेत, हेच या धमकीतून उघड होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पहाता येथील सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यांची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होणार !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेला १० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. यंदा कोरोनामुळे कार्तिकी वारीच्या धर्तीवर श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्राही प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडावी, असा अभिप्राय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.