समान नागरी कायदा न करण्यामागे केवळ अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, हेच कारण !

‘सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह समान नागरी कायदा व्हावा’, असे असतांना तत्कालीन केंद्र सरकारने त्यासाठी नकार देणे, या पाठीमागे केवळ अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन हेच कारण होते.

इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखामध्ये ‘हिंदु’ धर्माचा पर्यायच नाही

हिंदु धर्माचा उल्लेख करून त्यामध्ये अन्य कुणाला समभाग अपेक्षित आहे, याची टीपही अर्जात देता आली असती. तसे न करता बहुसंख्य हिंदु धर्माला डावलून त्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा हेतुपुरस्सर उल्लेख करणाऱ्यांचा हिंदुद्वेष यातून उघड होत आहे.

‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

उर्दू ही राज्य किंवा राष्ट्र भाषा नाही. तरीही असे फलक छापून ते तहसील कार्यालयात लावण्यामागील सरकारचा हेतू काय आहे, हे जनतेला समजले पाहिजे. याविषयी सरकारने लेखी स्वरूपात आपला खुलासा करावा.

भाजपकडून ५०० ख्रिस्ती, तर ११२ मुसलमानांना उमेदवारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांची एकत्रित लोकसंख्या ४५ टक्के आहे, तर हिंदू ५५ टक्के आहेत.

अजानची स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास मी विरोध दर्शवला ! – पांडुरंग सकपाळ, विभागप्रमुख, शिवसेना

मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेने अजानची सार्वजनिकरित्या स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून देत स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास विरोध दर्शवला, असे स्पष्टीकरण दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले.

ओवैसी विकास नाही, तर रोहिंग्यांना भारतात आणण्याची मागणी करतात ! – खासदार तेजस्वी सूर्या, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे  इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

अन्सारींचे नक्राश्रू !

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्‍न आहे !

हिंदु मुलींचे दलाल !

मोदी सरकारने या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता हिंदु मुलींची अब्रू वाचवणारा, त्यांची दलाली रोखणारा आणि प्राण वाचवणारा कायदा येण्यासाठी राज्यघटनेत आवश्यक ते पालट करावेत, अशी तमाम हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदुत्वाचा र्‍हास होत असतांना निद्रिस्त असलेले केरळमधील हिंदू !

काश्मिरी पंडितांविषयी काय झाले, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. हिंदूंना इतिहासापासून शिकायची इच्छा नाही. जोपर्यंत संकट दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते विश्‍वास ठेवत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील हिंदू !

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा आणणे राज्यघटनाविरोधी !

राजस्थानचे काँग्रेसी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम ! मुसलमान हिंदु नाव धारण करत हिंदु तरुणींची फसवणूक करतात याला गेहलोत प्रेम समजतात का ? जर नाही, तर ते याच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत ?