
मुंबई – औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे. काँग्रेसने औरंगाबाद नामांतराला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘औरंगाबाद नामांतराचे सूत्र हे नवीन नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही असे सांगितले होते. आम्ही अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत आलो आहोत. काँग्रेसने औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ या नामांतराला विरोध करण्याचे काही कारण नाही; कारण औरंगजेब हा काही धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, तसेच किमान समान कार्यक्रम वेगळा आहे. यामुळे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही.’’
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा ! – विश्व हिंदू परिषद
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !