गेल्या ७४ वर्षांत पाकमध्ये एकही नवीन मंदिर उभारले नाही !

इस्लामी देश पाकमध्ये याहून वेगळी काय स्थिती असणार ? याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत. आता भारत सरकारनेच या मंदिरांच्या आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !

(म्हणे) ‘गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून बंगालमध्ये गोहत्या होत असतांना ती कुणीही रोखू शकत नाही !’

बंगालचे धर्मांध मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी हे हेतूपुरस्सर असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. केंद्रसरकारने संपूर्ण देशात गोहत्याबंदी केली, तरच सिद्दीकुल्लाह यांच्यासारखे धर्मांध वठणीवर येतील !

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात महिलादिनी केवळ महिलांचे लसीकरण ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली महापालिका

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या २ आरोग्य केंद्रात केवळ महिलांसाठी कोरोना लसीकरण केले जाणार आहे

देशात महिलांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतीय स्त्री ही शालीन, सोज्वळ आणि पवित्र समजली जात होती; मात्र या सर्वेक्षणातून भारतीय महिलांचे झपाट्याने होत असलेले अधःपतन आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे.

अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची हॉटेल्स का आहेत ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो !

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

महोबा (उत्तरप्रदेश) येथे मुन्ना खान उपाख्य असफाक खान याने एका २१ वर्षीय हिंदु तरुणीला ‘हिंदू’ असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अनेक दिवस तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले.

कराड येथे २२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केलेल्या संचारबंदीचा नियम भंग करणार्‍या २२ जणांवर कराड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सरकारी कर्मचारी ऐकत नसतील, तर त्यांना बांबूचे फटके मारा ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा जनतेला सल्ला

हे म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वठणीवर आणण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? असे सल्ले देण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

तृणमूल काँग्रेसच्या धर्मांध नेत्याच्या समर्थकांकडून पक्षाच्या कार्यालयाची जाळपोळ !

तृणमूल काँग्रेसने दक्षिण २४ परगणामधील भानगर भागातील इच्छुक नेते अराबूल इस्लाम यांना विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच कार्यालयाची जाळपोळ केली.

श्रीराममंदिरासाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट रक्कम गोळा झाल्याने घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद !

मंदिराला लागणार्‍या पैशांपेक्षा अधिक गोळा झालेल्या रकमेचा व्यय देशातील जीर्णावस्थेत असलेल्या प्राचीन आणि मोठ्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी करावा, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी धर्मशिक्षण देणारी केंद्रे उघडावीत, असेच हिंदूंना वाटते !