हा सल्ला म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी हे घटक जनतेची कामे करत नसतील, तर त्यांना वठणीवर आणण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? असे सल्ले देण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

बेगूसराय (बिहार) – सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात. मला या लोकांना सांगायचे आहे की, एवढ्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही माझ्याकडे कशाला येता ? खासदार, आमदार, गावचे प्रमुख, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी या सर्वांचे कर्तव्य आहे की, त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही, तर मग दोन्ही हातात बांबूची काठी घ्या आणि त्यांच्या डोक्यावर मारा.
#WATCH | If someone (any government official) doesn’t listen to your grievances, hit them with a bamboo stick. Neither we ask them to do any illegitimate job, nor will we tolerate illegitimate ‘nanga nritya’ by any official: Union Minister Giriraj Singh in Begusarai, Bihar pic.twitter.com/Wxc6TlHiYC
— ANI (@ANI) March 6, 2021
जर असे करूनही तुमचे काम होत नसेल, तर मी तुमच्यासमवेत आहे, असा सल्ला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी येथे त्यांच्या मतदारसंघातील जनतेला दिला.
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद