हा सल्ला म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी हे घटक जनतेची कामे करत नसतील, तर त्यांना वठणीवर आणण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? असे सल्ले देण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

बेगूसराय (बिहार) – सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात. मला या लोकांना सांगायचे आहे की, एवढ्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही माझ्याकडे कशाला येता ? खासदार, आमदार, गावचे प्रमुख, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी या सर्वांचे कर्तव्य आहे की, त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही, तर मग दोन्ही हातात बांबूची काठी घ्या आणि त्यांच्या डोक्यावर मारा.
#WATCH | If someone (any government official) doesn’t listen to your grievances, hit them with a bamboo stick. Neither we ask them to do any illegitimate job, nor will we tolerate illegitimate ‘nanga nritya’ by any official: Union Minister Giriraj Singh in Begusarai, Bihar pic.twitter.com/Wxc6TlHiYC
— ANI (@ANI) March 6, 2021
जर असे करूनही तुमचे काम होत नसेल, तर मी तुमच्यासमवेत आहे, असा सल्ला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी येथे त्यांच्या मतदारसंघातील जनतेला दिला.
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयाच्या दारातच रात्रभर झोपून केले अनोखे आंदोलन !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन