श्री जगन्नाथपुरी मंदिराची ३५ सहस्र एकर भूमीची ओडिशा सरकार विक्री करणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर आतापर्यंत जे होत आले आहे, तेच श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या संदर्भात होत आहे ! अशा घटना रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवून भक्तांना सोपवणे आवश्यक आहे अन्यथा मंदिरांची भूमी, संपत्ती सर्व काही सरकार विकून मोकळी होईल !

देशभरात एका मासामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ६३ टक्क्यांची वाढ !

गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे.

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

सद्दाम हुसेन आणि गद्दाफी हेही निवडणुका जिंकत होते; पण तेथे लोकशाही होती, असे नाही ! – राहुल गांधी यांची केंद्रातील भाजप सरकारवर टीका

विदेशी विश्‍वविद्यालयाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारतात लोकशाही नाही’, असे चित्र उभे करून भारताची मानहानी करणारे राहुल गांधी !

रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावू नका ! – कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाचे परिपत्रक

नियमाचे पालन दर्गा आणि मशिदी करत नसतील, तर बोर्डाने अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले पाहिजे ! तसेच या नियमांचे पालन न करणारे दर्गे आणि मशिदी यांवर पोलीस कारवाई करत नसतील, अशा बहिर्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

आगरा येथे मंदिर परिसरातच एका साधूंची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या

उत्तरप्रदेशात साधूंच्या हत्यांचे सत्र चालूच ! भाजपच्या राज्यात सातत्याने अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर उपायोजना करून अशा घटना रोखल्या पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंकडून अजानच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार !

याविषयी सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस निदान कुलगुरूंच्या तक्रारीकडे तरी लक्ष देतील, अशी अपेक्षा ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना जनतेला अजानमुळे त्रास होऊ नये, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजप सत्तेत आल्यापासून पोलीस चकमकीत मारले गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुसलमान !’  

जर ओवैसी यांनी दिलेली आकडेवारी खरी असेल, तर इतक्या मोठ्या संख्येने मुसलमान गुन्हेगारी कृत्यात सहभागी होते, हेच सिद्ध होते; कारण आतापर्यंत या चकमकीवरून पोलिसांवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही कि गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ऐकिवात नाही.

(म्हणे) ‘इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना अनुदान न मिळाल्यास या शाळांतील पालक आणि विद्यार्थी ते सहन करणार नाहीत !’ – ‘फोर्स’ संघटना

भावी पिढीची अधोगती करणार्‍या इंग्रजाळलेल्या पालकांच्या ताकदीला भीक घालायची का ?  ते सरकारने ठरवावे !

राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचार्‍यांचा २ दिवस संप

बँकांच्या खासगीकरणामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना न्यूनतम कर्ज दिले जाईल.