गोवा मनोरंजन संस्थेकडून नूतनीकरण करण्यात आलेला मल्टिप्लेक्स प्रकल्प आता जनतेसाठी खुला

कोविडमुळे जवळजवळ १ वर्ष बंद ठेवण्यात आलेला गोवा मनोरंजन संस्थेचा मल्टिप्लेक्स प्रकल्प जनतेसाठी १ मार्च २०२१ या दिवशी पुन्हा चालू करण्यात आला आहे.

कळंगुट येथे २ निरनिराळ्या छाप्यांमध्ये एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

कळंगुट पोलिसांनी ९ मार्च या दिवशी २ निरनिराळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गोवर्‍यांवर गायीच्या तुपाद्वारे हवन केल्यावर १२ घंटे घर संक्रमणमुक्त होते ! – मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर

सूर्योदय आणि सूर्यास्त यांवेळी गोवर्‍यांवर अक्षता मिसळलेल्या गायीच्या तुपाद्वारे २ वेळा आहुत्या दिल्यावर घर संक्रमणमुक्त (सॅनिटाईज) होते, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर यांनी येथे केले.

‘प्रँक व्हिडिओ’च्या विरोधात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे तक्रार !

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाने खरेतर स्वत:हून या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे. नेहमी कुणा संघटनांनीच असे अपप्रकार समोर आणल्यावर प्रशासनास जाग येणे, लज्जास्पद !

‘जैश-उल-हिंद’च्या नावाने टेलीग्रामवरून आलेला स्फोटके ठेवल्याचे दायित्व घेणारा संदेश तिहार कारागृहातून !

मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवास्थानाच्या बाहेर स्फोटके ठेवल्याचे दायित्व घेतल्याचा संदेश तिहार कारागृहातून आल्याचे समोर आले.

वर्ष २०१८ च्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये दंगली, हत्या, बलात्कार आदींच्या घटनांत अल्प प्रमाणात घट ! – केंद्र सरकारचा दावा

देशातील गुन्हेगारीत अल्प प्रमाणात घट होण्याऐवजी ते पूर्णपणे रोखणे हेच लक्ष्य असले पाहिजे, तरच समाज सुरक्षित आणि शांततेत जगू शकेल !

ममता बॅनर्जी घायाळ झाल्याने निवडणुकीत दीड मास प्रचार करू शकणार नाहीत !

नंदीग्राम येथे प्रचार करत असतांना एका लहान अपघातात ममता बॅनर्जी यांच्या पायाचा अस्थीभंग झाल्याने पुढील दीड मास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी ताजमहाल येथे हिंदु महासभेकडून शिवपूजन

ताजमहाल ही हिंदूंची वास्तू असून तेथे शिवालय होते, याचे अनेक पुरावे आहेत. त्या भावापोटी हिंदू तेथे जाऊन पूजा करतात. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद न घेता अशा प्रकारे अटक होणे हिंदूंना अपेक्षित नाही !