सांगली येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ३३ फूट !

पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे ६ द्वार दीड फुटांनी उचलून विसर्ग चालू केला आहे. सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पूर परिस्थितीची पहाणी केली.

‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना !

माजी आमदार नितीन शिंदे यांचा ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून समावेश !

राज्यातील २४५ उपसा जलसिंचन संस्थांच्या थकित मुद्दलाची रक्कम राज्यशासन देणार !

सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकित कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी सांगलीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. 

सध्याच्या काळात हिदूंना संघटित करून दबावतंत्राचा वापर केला पाहिजे ! – भगवंत जांभळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदूंनी पीडित हिंदु तरुणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून रोखठोक भूमिका घेतली पाहिजे, तसेच हिंदूंना संघटित करून त्याद्वारे दबावतंत्राचा वापर केला पाहिजे, असे परखड मत मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे यांनी येथे व्यक्त केले.

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या दिशेने !

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कृष्णा नदीतील पाणी पात्राच्या बाहेर पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जवळच्या परिसरात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची सिद्धता चालू केली आहे.

अर्थसंकल्पात गरीब वर्ग, युवक, शेतकरी आणि महिला यांचा विकास अन् प्रगती यांना प्राधान्य ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार

केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांचा विकास अन् प्रगती यांना पूर्ण प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषित केल्या आहेत.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे काढून निरपराध हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत !

विशाळगडावरील अतिक्रमणे वेळेत न काढणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तसेच शिवप्रेमी आणि निरपराध हिंदूंवरील अन्याय्य गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन २३ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

राहुल गांधी यांची खासदारकी रहित करा !

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सांगली येथे स्थानिक बसच्या फेर्‍या वाढवा ! – भाजप महिला मोर्चाची मागणी 

स्थानिक वाहतुकीसाठी सांगली आगाराकडे २० आणि मिरज आगाराकडे केवळ २० गाड्या आहेत. यामुळे सांगलीपासून २० किलोमीटर परिसरातून ये-जा करणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून तीन आसनी प्रवासी रिक्शांच्या विलंब शुल्क वसुलीला स्थगिती ! 

तीन आसनी रिक्शांसह सर्व प्रकारच्या वाहनांवर सरसकट विलंब शुल्क आकारणी अन्याय आहे.