कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी सापडलेले अर्धा किलो सोने सरकारजमा !

हिंदूंच्या मंदिरांच्या सोन्यावर सरकारचा काय अधिकार ? मशीद किंवा चर्चच्या संपत्तीवर सरकार कधी असा अधिकार गाजवते का ? अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी आणि हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात रहाण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

बांगलादेशमध्ये मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड आणि दागिन्यांची लूट !

पाबना (बांगलादेश)च्या शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्‍या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्या आणि दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे.

मलप्पूरम् (केरळ) येथील मंदिरात हिजाब परिधान केलेल्या महिलेकडून बूट घालून प्रवेश !

हिंदूंच्या देशात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस होतेच कसे ? इस्लामी देशात अन्य धर्मीय असे करण्याचे धाडस करू शकतील का ? साम्यवाद्यांच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य अशा प्रकारे भंग केले जात असेल, तर आश्‍चर्य काय ?

हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कधी होणार ?

केरळच्या मलप्पूरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील वन्नियामबलम् मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याच्या प्रकरणी हिजाब घातलेल्या एका महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १३.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

बंगालच्या ओंकारनाथ मठाच्या भूमीवर बांधकाम व्यावसायिकाचे अतिक्रमण !

बंगालमध्ये आधीच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना मठावर अतिक्रमण होणे आणि मठाधिपतींना धमक्या मिळणे यांवर चाप बसण्याची शक्यता अल्पच आहे.

कुतुब मीनार परिसरातील मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आल्याने ती हटवावी ! – देहली येथील न्यायालयात याचिका

जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !

न्यायाची प्रतीक्षा !

मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत, यासाठी सरकारने आता कृतीशील व्हावे, हीच हिंदूंची अपेक्षा !

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

देहलीतील कुतुब मिनार परिसरात असलेली मशीद २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आली असून तेथे पुन्हा मंदिरांची पुनर्उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

निपाणी येथील श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटीची चोरी

येथील बडमंजी ‘प्लॉट’मध्ये असणार्‍या श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्रांहून अधिक रुपयांची चोरी केल्याची घटना २९ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. याशिवाय बसस्थानक परिसरातील मद्यालयातही चोरीची घटना घडली आहे.