
नवी देहली – पाकिस्तानला सिंधु जल करारांतर्गत देण्यात येणारे पाणी थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न चालू केले आहेत. या संदर्भात केंद्रीय पाणी पुरवठा मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवसास्थानी बैठकही आयोजित केली होती. यात परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील सहभागी झाले होते. यात हे पाणी ३ टप्प्यांत थांबवण्याचे नियोजन करण्यात आले; मात्र हे ३ टप्पे कोणते, हे सांगण्यात आले नाही. या संदर्भात केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील म्हणाले की, या संदर्भात ३ प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याद्वारे पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.
आम्ही कधीही सिंधु जल कराराच्या बाजूने नव्हतो ! – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरचा विचार केला, तर आम्ही कधीही सिंधु जल कराराच्या बाजूने नव्हतो. आमच्या लोकांसाठी सिंधु जल करार हा सर्वांत चुकीचा करार आहे, असे आमचे नेहमीच मत आहे. हे काश्मीरसाठी हानीकारक आहे.
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif
Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाच्या १२ प्रदेशांवर डागले शेकडो ड्रोन !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !