Telangana CM Appeal to PM : पाकिस्तानचे २ तुकडे करून पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करा !

तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान यांना आवाहन

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी

भाग्यनगर (तेलंगाणा) – आता पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान मोदी यांना पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो. आम्ही सर्व तुमच्यासमवेत आहोत, असे आवाहन तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून केले आहे. ते येथे काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चाच्या वेळी बोलत होते. यात ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) खासदार असदुद्दीन ओवैसीही यात सहभागी झाले होते.

रेवंत रेड्डी पुढे म्हणाले की, वर्ष १९७१ मध्ये जेव्हा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले, तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकचे २ तुकडे केले. आजही आपल्याला पाकिस्तानविरुद्ध अशीच कारवाई करावी लागत आहे.