जयपूर (राजस्थान) – पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना ‘हमास’चे ३ प्रमुख कमांडर डॉ. खालिद कद्दूमी, डॉ. नाजी जहीर आणि मुफ्ती आझम हे गेल्या ६ महिन्यांपासून पाकमध्ये आतंकवादी तळ चालवत आहेत. ते लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए- मुस्तफा यांसारख्या आतंकवादी संघटनांच्या कायम संपर्कात आहेत. त्यांनी तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाची अनेकदा भेट घेतली आहे. याचा काळात त्यांनी पहलगाम येथील आक्रमणाचा कट रचला, अशी माहिती अन्वेषण यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्याच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितले की, आक्रमणाची पद्धत हमासशी मिळती-जुळती आहे. आता अन्वेषण यंत्रणा हमासच्या सहभागाचे पुरावे गोळा करत आहे.
गाझामध्ये इस्रायलने केलेल्या आक्रमणानंतर हमासचे ३० सहस्र असणारे आतंकवादी आता केवळ ३ सहस्र इतकेच शिल्लक राहिले आहेत. तसेच त्याचे मोठे नेतेही ठार झाले आहेत. आता जिवंत असणार्यांपेकी कमांडर डॉ. खालिद कद्दूमी हा नेता आहे.
कद्दुमी याने पाकिस्तानी संसदेत भारताच्या विरोधात गरळ ओकत सांगितले होते की, हमास असतांना भारत चीन-पाक आर्थिक महामार्ग रोखू शकणार नाही.
संपादकीय भूमिकाभारतातील पॅलेस्टाईन समर्थक आता तोंड उघडणार आहेत का ? |