राज्याच्या कानाकोपर्‍यात पाकिस्तानी नागरिक !

महाराष्ट्रातील ४८ शहरांमध्ये तब्बल ५ सहस्र २३ पाकिस्तानी आहेत. गंभीर सूत्र म्हणजे यातील केवळ ५१ जणांकडेच वैध कागदपत्रे आढळली आहेत. ४ सहस्र ९७२ पाकिस्तानी महाराष्ट्रात अवैध वास्तव्य करत आहेत.

जत तालुक्यातील आश्रमशाळेतील ६ मुलींवर अत्याचार करणार्‍या शिक्षकांवर गुन्हा नोंद करावा !

जत तालुक्यातील आश्रमशाळेत शिक्षकांकडून ६ मुलींवर अत्याचार झाल्याचे वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार सुमोटो चौकशी करून त्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा, अशी मागणी अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे यांनी जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांच्याकडे केली.

काश्मीर आणि बंगाल राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नवी मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या !

मुलगा अमली पदार्थ तस्करीत अडकल्याने पाऊल उचलल्याची शक्यता

प्रवाशांशी उद्धट बोलणार्‍या आणि मनमानी भाडे मागणार्‍या रिक्शाचालकांवर प्रादेशिक परिवहनाची कारवाई !

‘रिक्शाचालकांमध्ये सुधारणा होणार कि नाही ?’ पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्शाचालकांच्या विरोधात दिलेल्या तक्रार क्रमांकावर नागरिकांच्या २५२ तक्रारी, ५० जणांवर दंडात्मक कारवाई, तर ५० जणांचा वाहन चालवण्याचा परवाना काही दिवसांसाठी रहित

आळंदी देवस्थानच्या इतिहासात विश्वस्त मंडळावर प्रथमच एका महिलेची नियुक्ती !

आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी प्रथमच अधिवक्त्या रोहिणी पवार यांनी पहिल्या महिला विश्वस्त होण्याचा मान मिळवून रचला इतिहास. अधिवक्त्या रोहिणी पवार यांच्यासह ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर (लोंढे) यांची विश्वस्तपदी निवड

‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने हिंदु बांधवांना श्रद्धांजली !

‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने संघाच्या कार्यालयात पहलगाम येथे आतंकवादी आक्रमणात मृत्यू झालेल्या हिंदु बांधवांना श्रद्धांजली वहाण्यात आली.

दोडामार्गमध्ये ५ टेंपोतून होणारी गोवंशीयांची अवैध वाहतूक हिंदुत्वनिष्ठांनी रोखली

२६ एप्रिल या दिवशी गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांतून कर्नाटक राज्यात  गोवंशीयांची अवैधरित्या वाहतूक करणारे ५ टेंपो गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दोडामार्ग येथे घाटात रोखले. त्यानंतर हे टेंपो पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना !

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाच्या  पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात मंदिरात भ्रमणभाष, तसेच ‘कॅमेरा’सदृश्यप्रवेश बंदीची तंतोतंत कार्यवाही करण्यात येत आहे.

धर्मांध आतंकवाद्यांशी हिंदूंची तुलना करणारा स्टेटस ठेवणार्‍या बांदा येथील शिक्षिकेच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

व्हॉट्सॲपवर धर्मांध आतंकवाद्यांशी हिंदूंची तुलना करणारा स्टेटस ठेवणार्‍या बांदा शहरातील एका धर्मांध शिक्षिकेच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.