
तेहरान (इराण) – सध्याच्या कठीण काळात चांगले सामंजस्य निर्माण करण्यासाठी तेहरान भारत आणि पाकिस्तान येथील आमच्या कार्यालयांचा वापर करण्यास सिद्ध आहे, असे सांगत इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अरघची यांनी भारत अन् पाक यांच्यातील सध्याच्या स्थितीवर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
शिमला कराराच्या वेळेचा पाकचा ध्वज हटवला !
वर्ष १९७२ मध्ये हिमाचल प्रदेशाच्या राजभवनात भारत आणि पाक यांच्यात शिमला करार झाला होता. या कराराच्या कादगपत्रांवर ज्या पटलाच्या ठिकाणी बसून स्वाक्षरी करण्यात आली होती, ते पटल जतन करून ठेवण्यात आले होते. या पटलाच्या दोन्ही बाजूंना भारत आणि पाक यांचे ध्वज लावलेले होते. आता हा करार स्थगित केल्यानंतर भारताने येथील पाकचा ध्वज काढून टाकला आहे.
संपादकीय भूमिकाभारताला कुणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही, हे भारताने सर्वांनाच ठणकावून सांगितले पाहिजे ! |