अभिनेते सुनिल शेट्टी यांचे आवाहन !
मुंबई : पहलगाममधील आतंकवादी आक्रमणानंतर भारतात विभाजन करणार्या शक्ती सक्रीय झाल्या आहेत. लोकांमध्ये भीती आणि द्वेष पसरवला जात आहे. अशा वेळी एकजुटीने रहाणे आवश्यक आहे. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला ठरवायचे आहे की, आपली पुढची सुट्टी केवळ काश्मीरमध्येच असेल. मीसुद्धा काश्मीरला जाण्यास सिद्ध आहे. एक अभिनेता म्हणून जर मला चित्रीकरणासाठी जावे लागले, तर मी निश्चितच जाईन आणि तेथे फिरून येईन, असे विधान अभिनेते सुनिल शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
शेट्टी पुढे म्हणाले,
‘‘जे लोक भीती आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विधानांना न भुलता आपण एकत्र येऊन त्यांना दाखवून दिले पाहिजे की, काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील. यासाठी आपले सैनिक, नेते, सर्व जनता या प्रयत्नात सहभागी आहेत. आपल्याला आतंकवाद्यांना दाखवून द्यायचे आहे की, आम्ही आतंकवादी आक्रमणांना घाबरत नाही.