अडखळ (तालुका दापोली) येथील हिंदु धर्मसभा

दापोली (रत्नागिरी) – आपल्याला हिंदु म्हणून एकत्र रहाण्याची आवश्यकता आहे. आजूबाजूला काय चालले आहे, ते बघा ! काश्मीर येथे धर्म विचारून हिंदु पर्यटकांवर गोळ्या घातल्या गेल्या. त्यामुळे जे पाकिस्तानचे गोडवे गाणारे आहेत, त्यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी हिंदु समाजाने विक्रेत्यांचा धर्म विचारूनच त्यांच्याकडून वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. ते लोक जर त्यांच्या धर्माबद्दल एवढे कडवट असतील, तर आपण कशाला त्यांना श्रीमंत करत आहोत ? हा कसला भाईचारा आणि सर्वधर्मसमभाव ?, असा प्रश्न मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला. तालुक्यातील अडखळ येथील धर्मसभेमध्ये ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की,
१. काही दुकानदार त्यांचा धर्म सांगणार नाहीत. त्यांनी ‘ते हिंदु आहेत’, असे सांगितले, तर त्यांना प्रथम ‘हनुमानचालिसा’ म्हणायला लावा. त्यांना ‘हनुमानचालिसा’ येत नसेल, तर त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका. त्यांनी आम्हाला ‘कलमा’ (अल्लाचा गौरव करणारी विधाने) म्हणायला लावला, निदान आम्ही ‘हनुमानचालिसा’ येते का ? एवढे तरी विचारूया.
२. हिंदु म्हणून तुम्ही एकत्र रहा, तुमच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो. ज्या देशात आपण रहातो ते हिंदु राष्ट्र आहे, हे आधी बोलायला शिका.या देशामध्ये ८५ टक्के हिंदू रहात असतील, तर तिथे हिंदूंचेच नियम चालणार. उर्वतिर कुणाचेही चालणार नाहीत. प्राधान्य हे हिंदूंना दिलेच पाहिजे.
३. याच बंदरात (अडखळ बंदरात) जेट्टीवर वाहन लावण्यावरून झालेल्या मारहाणीत आमच्या हिंदु बांधवांना मारहाण झाली. ही जागा बंदर विभागाची असतांना तेथे अनधिकृत ‘पार्किंग’ होते कसे ? यांनीच अनधिकृत बांधकाम करायची, नियम तोडायचा, चुकीच्या ठिकाणी ‘डंपर’ लावायचे, कायदे मोडायचे आणि मग दगड आमच्यावरच मारायचे, असे कसे चालेल ? ज्यांचे हात तुमच्या दिशेने दगड भिरकावतील, त्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत.
४. या समुद्रावर आपलेच राज्य असेल. तीच शक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवली होती. हा आमचा समुद्र किनारा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून मंत्रालयात बसलो आहे. कुणाचीही मस्ती इथे चालू देणार नाही. वळवळ करणारे साप आहेत, त्यांना कसे नीट करायचे त्याची सगळी औषधे माझ्याकडे आहेत.