केंद्र सरकारचे प्रसारमाध्यमांना सल्ला
नवी देहली – केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील वृत्तवाहिन्यांना भारतीय सैन्याच्या मोहिमा आणि सुरक्षादलांच्या हालचाली यांचे थेट प्रक्षेपण टाळण्याचा सल्ला दिला आहे. असे वृत्तांकन अनवधानाने शत्रूंना साहाय्य करू शकते, असे सरकारने म्हटले आहे.
मंत्रालयाने प्रसारित केलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सर्व प्रसारमाध्यमे, वृत्तसंस्था आणि सामाजिक माध्यमे यांचा वापर करणार्यांनी संरक्षण अन् इतर सुरक्षेच्या संदर्भातील घडामोडींशी संबंधित गोष्टींचे वृत्तांकन करतांना अत्यंत दायित्वाने वागावे. यासह विद्यमान कायदे अन् नियम यांचे काटेकोरपणे पालन करावे.
संपादकीय भूमिकामुळात असा सल्ला का द्यावा लागतो ? प्रसारमाध्यमांना त्यांचे दायित्व कसे कळत नाही ? जर कुणी याचे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर बंदीच घातली पाहिजे आणि देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे ! |