Pahalgam Terrorist Houses Demolished : काश्मीरमध्ये आतापर्यंत ६ आतंकवाद्यांची घरे स्फोट घडवून केली उद्ध्वस्त  

उद्ध्वस्त करण्यात आलेली आतंकवाद्यांची घरे

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये आतापर्यंत ६ आतंकवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. त्राल, अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान येथे शोध मोहिमेच्या वेळी भारतीय सैन्याने ही कारवाई केली.

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने (‘टी.आर्.एफ.’ने) आक्रमणाचे दायित्व फेटाळले !

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (‘टी.आर्.एफ्.’) या आतंकवादी संघटनेने पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात हात असल्याचे स्वतःहून सामाजिक माध्यमांतून म्हटले होते; मात्र आता या आतंकवादी संघटनेने कोलांटउडी मारत यात आक्रमणात तिचा हात नसल्याचा दावा केला आहे. यासाठी या संघटनने म्हटले आहे की, तिचे सामाजिक माध्यमांवरील खाते हॅक करण्यात आले आणि बनावट संदेश म्हणजे आक्रमणाचे दायित्व घेतल्याचा संदेश प्रसारित करण्यात आला. (कितीही खोटे म्हटले, तरी सत्य जगाला ठाऊक आहे ! – संपादक)

लंडनमधील पाक उच्चायुक्तालयातील सैन्याधिकार्‍याने भारतियांचा शिरच्छेद करण्याची दिली धमकी !

ब्रिटनची राजधानी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर पहलगाम आक्रमणाच्या निषेधार्थ निदर्शने करणार्‍या भारतियांना पाकच्या एका वरिष्ठ सैन्याधिकार्‍याने धमकावले. या अधिकार्‍याने हाताने गळा चिरण्याचे हातवारे केले आणि नंतर हसला. (अशी धमकी देणार्‍यांवर ब्रिटनचे पोलीस कारवाई करण्याची शक्यता नाहीच; कारण ब्रिटनमधील सरकारही आता मुसलमानांचे लांगूलचालन करत आहे ! – संपादक)

या वेळी या अधिकार्‍याने भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचे छायाचित्र असणारा फलक होतात धरला होता. यावर ‘चाय इज फॅन्टॅस्टिक’ (चहा अद्भुत आहे), असे लिहिले होते. अभिनंदन यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानी सैन्याने पकडले होते आणि नंतर त्यांची सुटका केली होती.

(म्हणे) ‘एकतर आमचे पाणी सिंधु नदीत वाहील, नाहीतर भारतियांचे रक्त वाहील !’ – बिलावल भुत्तो यांची गरळओक

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी एका जाहीर सभेत बोलतांना भारताविरुद्ध चिथावणीखोर विधान केले. ते म्हणाले की, एकतर आमचे पाणी सिंधु नदीत वाहील, नाहीतर त्यांचे (भारतियांचे) रक्त वाहील. (बिलावर भुत्तो यांच्या आजोबांनी भारतासमवेत १ सहस्र वर्ष युद्ध करण्याची भाषा केली होती आणि नंतर त्यांनाच पाकच्या सैन्याने फासावर लटकवले होते, हे बिलावल यांनी कायम लक्षात ठेवावे ! – संपादक)

सिंधु नदी आमची आहे आणि आमचीच राहील. तुम्ही सिंधु जल करार मोडणे शक्य नाही. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही सहस्रो वर्षांपासून या नदीचे वारसदार आहोत. (सहस्रो वर्षांपूर्वी इस्लाम आणि मुसलमान यांचे अस्तित्व तरी होते का ? – संपादक)

दोन्ही देश यातून काहीतरी मार्ग काढतील ! – डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी भारताच्या जवळ आहे आणि काश्मीरच्याही जवळ आहे. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना ओळखतो. पहलगाम येथील आक्रमण खूप वाईट होते. भारत आणि पाकिस्तान यांमध्ये नेहमीच तणाव राहिला आहे. काश्मीरवरील लढाई १ सहस्र ५०० वर्षांहून अधिक जुनी आहे. दोन्ही देश यातून काहीतरी मार्ग काढतील.

नेपाळमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने

काठमांडूमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर नेपाळी लोकांनी निदर्शने केली

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात नेपाळची राजधानी काठमांडूमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर नेपाळी लोकांनी निदर्शने केली. या आक्रमणात  एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

  • गुजरातमध्ये १ सहस्रांहून अधिक घुसखोरांना अटक

  • बनावट कागदपत्रांद्वारे बनवले आधारकार्ड

अटक करण्यात आलेले बांगलादेशी घुसखोर

गुजरातमधील सुरत आणि कर्णावती येथे पोलिसांनी १ सहस्रांहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घुसखोरांची लवकरात लवकर ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा आदेश दिला आहे. पकडण्यात आलेल्या या बांगलादेशींना लवकरात लवकर बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या घुसखोरांनी बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड आणि मतदान कार्ड बनवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (यांना भारतीय ओळखपत्र बनवून देणार्‍यांनाही बांगलादेशात पाठवून द्या ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

केवळ आतंकवाद्यांचीच नव्हे, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या काश्मिरी मुसलमानांचीही घरे अशी उद्ध्वस्त करण्यासह त्यांना भारतातून हाकलून लावले पाहिजे !