जमियत उलेमा-ए-हिंदच्या दोन्ही गटांकडून पहलगाम येथील आक्रमणाचा निषेध

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – मुसलमानांच्या धार्मिक संघटना ‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या दोन्ही गटांनी पहलगाम येथील जिहादी आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचा अभ्यासक) अर्शद मदनी म्हणाले की, निरपराध लोकांना मारणारे मानव नाहीत, तर प्राणी आहेत. इस्लाममध्ये आतंकवादाला वाव नाही.
"No place for terrorism in Islam!" — claims Jamiat Ulema-e-Hind while condemning the #PahalgamTerroristAttack
But where was this "realization" for the last 35 years?
Only when Hindus demand action against jihadists and the destruction of Pakistan, does Jamiat suddenly wake up!… pic.twitter.com/ND9zEP5g4b
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 26, 2025
जमियतच्या दुसर्या गटाचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी या घटनेला ‘अमानवी कृत्य’ म्हटले आहे. ते म्हणाले की, ही घटना कोणत्याही धर्माशी जोडता येणार नाही आणि जे लोक ती इस्लामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्याच्या खर्या शिकवणींची माहिती नाही. (इस्लामची खरी शिकवण काय आहे, हे मदनी यांनी भारतियांना आता स्पष्ट सांगावीच आणि जिहादी आतंकवाद्यांना कोणत्या इस्लामीची शिकवण कुठून आणि का दिली जात आहे ? हेही सांगावे ! – संपादक)
‘दारुल उलूम देवबंद’ मदरशाकडूनही निषेध
सहारनपूर येथील एक प्रमुख इस्लामी मदरसा ‘दारुल उलूम देवबंद’ने या आक्रमणाला ‘मानवतेविरुद्धचे कृत्य’ म्हटले आहे. दारुल उलूम देवबंदचे ‘मोहतामिम’ (व्यवस्थापक) मुफ्ती (शरीयत कायद्यानुसार न्यायनिवाडा करणारा) अबुल कासिम नोमानी यांनी या आक्रमणाला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, हे आक्रमण देशाची एकता आणि अखंडता यांसाठी गंभीर धोका आहे. मृतांच्या कुटुंबियांसमवेत आमची सहानुभूती आहे आणि घायाळ झालेल्यांनी लवकर बरे व्हावे, अशी आम्ही प्रार्थना करतो. केंद्र सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घ्यावे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये; म्हणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. (केंद्र सरकारने अशी कारवाई चालू केली, हेच मुसलमान त्यांच्यासाठी गळे काढायला चालू करतील ! संसदेवर आक्रमण करणारा महंमद अफझल, तसेच वर्ष १९९३ च्या मुंबईवरील आक्रमणातील आतंकवादी याकुब मेमन यांना फाशी देऊ नये; म्हणून हेच मुसलमान आंदोलन करत होते, सर्वाेच्च न्यायालयात मध्यरात्री सुनावणी करण्यास भाग पाडत होते, हे विसरू नये ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|