(म्हणे) ‘मुसलमानांसाठी भारत धोकादायक आणि हिंसक !’ – दक्षिण आशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीजचा अहवाल

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! काश्मीरमधून हिंदूंचा वंशसंहार कुणी केला ?, तसेच अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथे हिंदू पुढे औषधालाही शिल्लक रहाणार नसतांना त्याविषयी ही संघटना आंधळी, बहिरी आणि मुकी का आहे ?

दारूबंदी असून बिहारमधील पुरुष दारू पिण्यात देशात पुढे !

दारूबंदी असतांनाही तेथील पुरुषांना दारू मिळतेच कशी ? अशा प्रकारे दारू पिण्यात बिहार पुढे असणे, हे तेथील शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पदच होय !

तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन

देवीने सोबत आलेल्या भक्तांच्या माध्यमातून ‘सनातनचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, असा आशीर्वाद दिला, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची प्रशंसा केली. भक्तांनी सांगितले की, सनातनचे कार्य अद्भुत आहे. आम्हीही तुमच्या कार्याला हातभर लावू.

भारताविरोधातील आक्रमकता थांबवण्याचा अमेरिकेचा चीनला सल्ला

अमेरिकेच्या संसदेने संरक्षण धोरण विधेयक संमत केले असून यात चीनी सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भारताविरोधात चालू असलेली सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के दरात तिकीट उपलब्ध होणार !

देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडिया आस्थापनाच्या विमानाचे तिकीट निम्म्या दरात मिळणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आलेली आहे; मात्र यासाठी काही अटी असणार आहेत.

गुजरातमधील २१४ पैकी ६२ रुग्णालयांकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ नाही ! – सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले

रुग्णालयांच्या सुरक्षेविषयीची इतका हलगर्जीपणा होतो आणि  त्याकडे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन दुर्लक्ष करतात, हे केवळ भारतातच घडू शकते ! न्यायालयाने या संदर्भातील दोषींना कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे, असे जनतेला वाटते !

पाकिस्तानात बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याचा कायदा लागू !

• विशेष न्यायालये स्थापन करून ४ मासांतच निकाल लावणार • योग्य प्रकारे अन्वेषण न करणारे पोलीस आणि सरकारी अधिकारी यांना दंड होणार : पाकिस्तान असा कायदा बनवू शकतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पुढारलेला असलेला भारत का बनवू शकत नाही ?

श्रीलंकेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अग्नीसंस्कार करण्यास मुसलमानांचा पुन्हा विरोध !

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृतदेहावर अग्नीसंस्कार केल्यावर त्यातील सर्व प्रकारचे रोगांचे विषाणू कायमस्वरूपी नष्ट होतात अन् अनिष्ट शक्तींचाही त्रास होत नाही. तसेच अग्नीसंस्कारामुळे जागेचीही बचत होते. याउलट पुरल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात !

हिंदु धर्म अणि मंदिरे यांच्या रक्षणार्थ विदर्भस्तरीय मंदिर विश्‍वस्तांची ऑनलाईन बैठक

या बैठकीत नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. प्रत्येक मंदिरामध्ये सात्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, धर्मशिक्षण फलक लावावेत, सर्व धर्मबंधूंनी संघटित व्हावे, यांवर सर्वांची सहमती झाली.

‘कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे फेसबूकची मवाळ भूमिका !’ – अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा थयथयाट !

हिंदूंच्या संघटनांना ‘हिंसक’ ठरवण्याच्या केलेल्या या प्रयत्नांवरून भारत सरकारने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’वर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! भारतात अशा दैनिकांच्या विक्रीवर आणि संकेस्थळावर बंदी घातली पाहिजे !