मंदिर रक्षणार्थ संघटित होण्यासाठी मंदिर विश्वस्त सहमत

यवतमाळ, १६ डिसेंबर (वार्ता.) – मंदिरे हे चैतन्याचे स्रोत आहेत, तसेच हिंदु धर्माची आधारशिला आहेत. मंदिरातून हिंदूंना धर्माचरण करण्याची दिशा मिळते; पण सध्या मंदिरांतील पैशांवर शासनाचा डोळा आहे. मंदिरांचे सरकारीकरण करून त्यातील संपत्ती शासन जमा करत आहे. मशीद आणि चर्च यांमध्ये मात्र शासन हस्तक्षेप करत नाही. हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, मंदिरे भक्तांकडे सुरक्षित रहावीत, यांसाठी ११ डिसेंबर या दिवशी विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिर विश्वस्तांची ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली. यामध्ये हिंदूंच्या प्रत्येक मंदिरामध्ये सात्त्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, मंदिरांमधून देवतांची माहिती असलेले धर्मशिक्षण फलक लावण्यात यावेत, मंदिर रक्षणासाठी सर्व धर्मबंधूंनी संघटित व्हावे, यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली.
या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी मार्गदर्शन केले.
मंदिर विश्वस्तांचे अभिप्राय१. बैठकीमध्ये वक्त्यांनी मांडलेले हिंदु धर्मावरील सर्व आघात हे वास्तव आहेत. ते थांबले पाहिजेत. |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !