यवतमाळ जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळ यांचे परिसर मद्य-मांस मुक्त करा !
महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना मागणी
महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना मागणी
श्री काळेश्वर महादेव संस्थान, भूजवाडा (ता. दर्यापूर, जि. अमरावती) यांच्या मालकीच्या शेतभूमीवरील कब्जेदाराने कूळ खरेदीसाठी प्रविष्ट केलेले प्रकरण तहसीलदारांनी १० जुलै या दिवशी फेटाळून मंदिराच्या हक्काला कायदेशीर मान्यता दिली.
हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांना निवेदन कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन अन् पर्यावरणवादी स्वत:ची कृतीशून्यता लपवून वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवाला प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवतात. त्यामुळेच श्री गणेशमूर्तींच्या वहात्या … Read more
वर्ष २००२ नंतर मात्र ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’च्या अंतर्गत जिवंत नाग पकडण्यास आणि त्यांची पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
स्थानिक मंदिर विश्वस्तांचे मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करणे आणि प्रत्येक हिंदूच्या रक्षणासाठी प्रयत्नशील रहाणे, याचा निर्धार ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीत करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मासाठी सर्वांना संघटित झाल्यास अधर्म संपतो, हे आर्य चाणक्यांनी धनानंदाला संपवून दाखवून दिले. धर्म टिकला तरच आपण टिकणार आहोत. देव, देश, मंदिर आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी हिंदूंनी जागृत व्हावे. सर्व मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील आघात थांबतील.
श्रीरामनारायण मिश्र हे अखिल विश्व सरयूपारिण ब्राह्मण महासभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर भारतीय संघ नागपूरचे अध्यक्ष आहेत.
राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण झाले असल्यामुळे बर्याच मंदिरांमधून पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक परंपरांचे उच्चाटन होणे, मंदिरांच्या संपत्तीचा अपहार करणे, देवस्थानच्या भूमींवर अतिक्रमण होणे, मंदिरांचे पावित्र्य टिकून रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील न रहाणे हे प्रकार होत आहेत. प्रजेला सनातन धर्माचे शिक्षण न दिल्यामुळे त्याचे दुष्परिणाम सर्वत्र दिसत आहेत.
‘श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’चे काम चालू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील २० उपदेवतांच्या मूर्ती हालवण्यात आल्या आहेत. मंदिराची रचना पालटाची कामे चालू करतांना कोणतीही योग्य ती काळजी न घेतल्याने प्राचीन श्री ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणामुळे दुभंगली आहे.