वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी ! – आमदार गोपीचंद पडळकर, भाजप

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी २० पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड टोकाची भूमिका मांडते. २०१२ मध्येही असाच काहीसा प्रयत्न झाला होता.

पुणे येथील उद्योजकाची सायबर चोरांकडून बिहारमध्ये हत्या, १५ आरोपी अटकेत !

झारखंडमधील मोठी ऑर्डर देतो, असे आमीष दाखवून सायबर चोरांनी पुणे येथील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहराजवळील जहानाबाद येथे बोलावले. त्यांना शेतात नेऊन पैशांची मागणी केली.

धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याने पाणीकपात होणार नाही !

गतवर्षीपेक्षा यावर्षी २ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पुढील ३ महिन्यांत प्रत्येकी ५ टी.एम्.सी. पाणी दिले जाईल. या व्यतिरिक्त १ टी.एम्.सी. पाणी साठा शिल्लक राहील.

धर्मांध निवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार !

धर्मांधांचे वय कितीही असले, तरी त्यांची वासनांधता जात नाही, हे लक्षात घेऊन अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

पूर्वजांचा शौर्याचा इतिहास न शिकवता ‘जगज्जेते’ नसणार्‍यांचा इतिहास आपल्यावर लादला गेला ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ञ

भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष श्री. प्रदीप रावत आणि अन्य उपस्थित होते.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम चालू !

शासकीय सेवेत, तसेच घरात शासकीय निवृत्तीवेतनधारक असतांना, एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न अधिक असतांना अनेक जण शासनाच्या विनामूल्य धान्य योजनेचा अपलाभ घेत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

नगर (पुणे) रस्त्यावरील बी.आर्.टी. मार्गास प्रारंभ

पुणे-नगर रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील ‘जलद बस मार्ग’ (बी.आर्.टी.) काढण्यास महापालिकेच्या हालचाली चालू.

पुणे येथून ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा’ ही विशेष रेल्वे सोडणार !

‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आय.आर्.सी.टी.सी.) चालू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेअंतर्गत ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा गुरुकृपा’सह ही विशेष रेल्वे येत्या १७ एप्रिलपासून पुणे येथून सोडण्यात येणार आहे.

अधिकाधिक हिंदू विविध व्यवसायांत उतरल्यासच हलालच्या समांतर अर्थव्यवस्थेतून बाहेर पडता येईल ! – प्रशांत कोतवाल, राष्ट्रीय संघटनमंत्री

डेक्कन परिसरातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहा’त १३ एप्रिल या दिवशी ‘भारत रक्षा मंच’ आयोजित व्याख्यान सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

बांगलादेशी अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने पुण्यातील वेश्यालयात विकले !

(यातून बांगलादेशींना या ना त्या मार्गाने भारतात घुसवण्याचे मोठे जाळेच आहे, हे यातून लक्षात येते. हे जाळे नष्ट करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता !