नारायणगाव (पुणे) येथील कापड दुकानाला भीषण आग !

नारायणगाव बसस्थानकाशेजारी असलेल्या धवल चव्हाण यांच्या ‘अष्टविनायक रेडिमेडस्’ या कापड दुकानाला १८ मार्चला पहाटे ४.३० वाजता आग लागली. आगीमध्ये दुकानदाराची ५ कोटी रुपयांची हानी झाली.

पुणे शहरातील ‘कोयता गँग’मागील ‘सूत्रधारां’वर कडक कारवाई करणार ! – मुख्यमंत्री

पुण्यात कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. विधीसंघर्षित मुले हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगार या मुलांना हाताशी धरून दहशत निर्माण करून हप्ते गोळा करतात.

खडकवासला येथे शासकीय मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याच्या तक्रारी !

वसतीगृहातील पिण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्या, तरी जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र विद्यार्थिनींना त्रास झाल्याचे वास्तव समोर असून याविषयी अजून सखोल चौकशीची आवश्यकता आहे, असे जनतेला वाटते.

पुणे येथे न्यायाधिशांच्या खोट्या स्वाक्षर्‍या करून जामीन मिळवल्याचे उघड !

अशांना आजन्म कारागृहात ठेवल्यासच असे कृत्य इतर कुणी करू धजावणार नाही !

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१८ मार्च २०२५)

देहू (पुणे) येथे भक्तीमय वातावरणात पार पडला ३७५ वा बीज सोहळा ! देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नामगजराने १६ मार्चला देहूनगरी दुमदुमली. काकडा आरती, महापूजा, हरिपाठ, वीणा, टाळ, मृदंग आणि चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणात ३७५ वा बीज सोहळा झाला. दुपारी १२ वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करत इंद्रायणी काठी भाविकांचा भक्तीसागर … Read more

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना कसायांची गोहत्या करण्याची हिंमत कशी होते ? – टी. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !

महाराष्ट्रात आढळली लाहोर (पाकिस्तान) येथून आलेली बनावट सौंदर्यप्रसाधने !

अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरि झिरवाळ यांची विधानसभेत माहिती !

शिवनेरी गडावरील पर्यटकांवर मधमाशांचे आक्रमण !

शिवनेरीवर साजर्‍या होत असलेल्या शिवजयंतीच्या सिद्धतेसाठी १६ मार्चला गडावर आलेल्या ४० ते ५० शिवभक्तांवर मधमाशांनी आक्रमण केले.

भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी शासन सर्वतोपरी साहाय्य करील ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र ही संत, शूर-वीर यांची भूमी आहे. भंडारा डोंगरावर प्रत्येक वारकर्‍याची श्रद्धा आहे. त्यामुळे भंडारा डोंगरातून जाणार्‍या बोगद्याचा मार्ग पालटण्यात आला आहे.

कार्यकारी अभियंत्यांसह ३ जणांना लाच घेतांना अटक

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !