पुणे येथील प्रतिष्ठित महाविद्यालयांनी अनेक वर्षे लेखापरीक्षण केलेच नाही !

‘मॉर्डन’, ‘एस्.पी. ’, ‘गरवारे’, ‘फर्ग्युसन’ या महाविद्यालयांचा समावेश

मावळ (पुणे) लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी प्राप्त !

उमेदवारांची अर्ज प्रक्रिया चालू होण्यापूर्वी ५२ तक्रारी आणि त्यानंतरच्या ८ दिवसांमध्ये १६ तक्रारींची वाढ झालेली आहे. त्यातील १३ तक्रारींवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, तर ५५ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.

आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !

आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची पंढरपूर येथे पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी आषाढी पायी वारी यंदा २९ जून या दिवशी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !

पूर्वीही मारहाण केली म्हणून केले होते निलंबित !

मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्‍याची कोयत्याने १६ वार करून हत्या !

सरकारी कार्यालयात उघड उघड कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !

पुण्यातील ज्‍योतिषाचार्य अतुल छाजेड अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज !

कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !

पुणे येथील पंतप्रधान मोदी यांची सभा ‘रेस कोर्स’ मैदानावर !

पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित केली आहे. सभेला येणार्‍या गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभास्थळामध्ये पालट करण्यात आलेला आहे.

लोहगाव (पुणे) विमानतळ देशामध्ये ९ व्या स्थानावर, तर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीमध्ये ८ व्या स्थानावर !

२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या पहाता गेल्या आर्थिक वर्षांमध्ये प्रवास करणार्‍या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशामध्ये ९ व्या स्थानावर आहे.

पुनावळे आणि चिखली येथील आर्.एम्.सी. प्रकल्पावर महापालिकेची कारवाई !

उघडउघड विनाअनुमती व्यवसाय होत असतांना प्रशासन काय करत होते ?

खडकवासला कालव्यातून विनाअनुमती पाणी उपसा करणार्‍या ३ शेतकर्‍यांवर कारवाई !

२३ एप्रिल या दिवशी वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील ३ शेतकर्‍यांवर कारवाई करण्यात आली. वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणीउपसा चालू असल्याचे निदर्शनास आले होते.