महर्षि व्यासनगरी यावल (जिल्हा जळगाव) येथील १४ मंदिरांत लागू होणार वस्त्रसंहिता !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महर्षि व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन येथील महर्षि व्यास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.

दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती.

धर्माचरण आणि धर्मरक्षण यांतून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

गोमंतकाच्या पावनभूमीत १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त देश-विदेशातील मान्यवरांनी विविध विषयांवर विचारमंथन केले.

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

तुळजापूर येथील श्री भवानीदेवी मंदिरातील वस्‍त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्‍या कपड्यांच्‍या संदर्भातील नियमावली) प्रकरणाच्‍या नंतर महाराष्‍ट्र राज्‍यात १३१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यात आली आहे आणि आता ही वस्‍त्रसंहिता सर्व मंदिरांमध्‍ये लागू करायची आहे.

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

हिंदु राष्ट्राची संकल्पना : सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन याचेच नाव !

सध्या रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. १६ जून या दिवशी या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्म आणि मंदिरे यांचे रक्षण’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण वर्ष २०१० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या भ्रष्टाचाराची सी.आय्.डी. चौकशी पूर्ण होऊन ४ वर्षे झाली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, हे खेदजनक आहे. सद्यःस्थितीतही मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे.

प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत.

वस्‍त्रसंहितेविषयी विचार करून निर्णय घेतला जाईल ! – सप्‍तशृंगी गड मंदिर संस्‍थान

सर्व शासकीय देवस्‍थानांत वस्‍त्रसंहितेविषयी जो काही निर्णय घेतला जाईल, त्‍याचा विचार करून योग्‍य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे संस्‍थानच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

वणी येथील सप्‍तशृंगी मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू होण्‍याविषयी १५ जूनला विश्‍वस्‍तांची महत्त्वपूर्ण बैठक !

सद्य:स्‍थितीत वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयीचा ठराव वणी ग्रामपंचायतीकडून मंदिर प्रशासनाकडे सुपुर्द करण्‍यात आला आहे. आता मंदिराचे विश्‍वस्‍त काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.