आषाढी वारीच्‍या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्‍काळ बंद करण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्‍यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट

वारी : भावभक्तीचा महासागर !

‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.

वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारकऱ्यांचे जाणून घेतलेले मनोगत इथे प्रस्तुत करीत आहोत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनरांगेत सुरक्षारक्षकाकडून भाविकाला धक्काबुक्की !

मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्यात तक्रारी होत असल्याचे प्रकार घडत आहेत

पंढरपूर वारीला ‘जागतिक वारसा’ नामांकन देण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागाला सादर !

पुरातत्व विभाग याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करणार आहे. हा प्रस्ताव सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाकडून पुरातत्व विभागाला ८ लाख ८५ सहस्र रुपये निधी देण्यात आला आहे.

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना ! – मोनिका सिंह ठाकूर, अपर जिल्हाधिकारी

यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. भाविकांना अडचण आल्यास १८००-२३३-१२४० या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, तसेच ०२१८६ – २२०२४० आणि २९९२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर पायी चालणार !

शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर असे ५ किलोमीटर अंतर चालणार आहेत.

प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आषाढ शुक्ल एकादशी सोहळा १७ जुलै या दिवशी होणार असून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येथे येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे २४ घंटे दर्शन चालू !

प्रतिवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्री विठ्ठलाचा पलंग काढून भाविकांना २४ घंटे दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात मांस आणि मटण विक्रीस बंदी !

केवळ यात्रा कालावधीतच नको, तर पंढरपूरसह महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्रे आणि देवस्थाने यांच्या परिसरात अशी बंदी कायमस्वरूपी हवी !