विचार, विश्वास आणि विकास त्रिसूत्रीवर काम करणार ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार, विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या २ पक्षांनी युती केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही रोखल्याचे आरोप होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वर्ष २०२२ मध्ये स्थगिती दिली होती. निवडणुका घेण्याचे दायित्व निवडणूक आयोगाचे आहे. येत्या ४ महिन्यांत निवडणुका घ्याव्यात, असा आदेश आला आहे. त्यामुळे निवडणुका होतीलच. त्याविषयी कार्यक्रम घोषित केला आहे, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले.

चाकण (पुणे) येथील पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एका कामाच्या २ योजना विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी होणार ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चाकण नगर परिषदे अंतर्गत ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियाना’च्या जिल्हा स्तरावरील योजनेत पाणीपुरवठा कामासाठी प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेश दिले.

अंबादास दानवे म्हणजे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेते आहेत, असे गौरवाद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. १६ जुलै या दिवशी विरोधी पक्षनेते दमानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट अखेरीस संपणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्या यांच्या राजकीय कार्य आणि संघर्षमय वाटचाल यांचे कौतुक केले.

शिवसागर जलाशयातील तराफा सेवा चालू !

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाण्याने तळ गाठला होता. यानंतर गत ३ महिन्यांपासून ‘तराफा सेवा’ (जलाशयातून वाहतूक करण्याची सेवा) बंद ठेवण्यात आली होती. मेपासून चांगला पाऊस झाल्याने कोयना धरण ७० टक्क्यांच्या वर भरले आहे. त्यामुळे १४ जुलैपासून शिवसागर जलाशयातील तराफा सेवा चालू करण्यात आली आहे.

संपादकीय : कचर्‍याचे (अ)व्यवस्थापन !

कचरा व्यवस्थापनातील तांत्रिक अन् व्यवस्थापकीय अडचणी सोडवण्यासह समाजाची वृत्ती पालटण्यासाठीही प्रयत्न होणे महत्त्वाचे !

अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही ! – उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई येथील अनधिकृत बांधकामांची सूची आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही.

सर्वोच्च न्यायालयातील ३ महिन्यांत निकाल लागण्याची शक्यता !

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह दिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला वेगळे नाव आणि मशाल हे वेगळे चिन्ह घ्यावे लागले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गट सर्वाेच्च न्यायालयात गेला होता. त्याचा निकाल पुढील ३ महिन्यांत लागण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज ३० सप्टेंबरपर्यंत चालू करण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ९४ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कामकाज चालू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

UNESCO World Heritage : शिवरायांचे १२ गडदुर्ग ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट ! 

छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या गडदुर्गांचा ऐतिहासिक ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे, आता केवळ १२ नव्हे, तर राज्यातील सर्वच गडदुर्गांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा सूचीत समावेश होण्यासाठी शासन आणि गडप्रेमी यांनी प्रयत्न करावेत !