ममता बॅनर्जी भ्रष्ट आणि सैतान व्यक्ती असल्याने त्यांचा रामावर राग असणे स्वाभाविक ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करण्यास उभ्या राहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता. त्यावरील सिंह यांची ही प्रतिक्रिया आहे.

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !

हिंदु धर्म, देवता आदींचा होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा कायदा करा !

गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, चित्रपट, विज्ञापने आदींच्या माध्यमांतून हिंदु देवता, साधू, संत आदींचा अवमान करण्यात येत आहे. याचा हिंदूंकडून विरोधही केला जात आहे; मात्र कठोर कायदा नसल्याने आरोपींवर कठोर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत.

केरळमध्ये मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाचा आवाज ५५ डेसीबलपेक्षा अधिक न ठेवण्याचा सरकारचा आदेश

मंदिरांच्या ध्वनीक्षेपकावरून असा आदेश देणारे केरळमधील कम्युनिस्ट सरकार मशिदींवरील ध्वनीक्षेपकांच्या संदर्भात असा आदेश देण्याचे धाडस का दाखवत नाही ?

सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘तांडव’ वेब सिरीजचे पोस्टर जाळून व्यक्त केला संताप

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात सोलापूर येथे हिंदु संघटनांच्या वतीने ‘तांडव’ वेब सिरीजचे आणि अभिनेता सैफ अली खानचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला.

‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी !

‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.

कतरास (झारखंड) येथे धर्माभिमान्यांकडून ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात तक्रार

‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. दीपक केशरी यांनी ऑनलाइन तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करावी !

‘तांडव’ या वेब मालिकेमध्ये हिंदु देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावून जातीय द्वेष पसरवण्यात आला आहे. यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली.

दिग्दर्शक अली जफर यांसह ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून संमत

‘तांडव’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांसाठी उत्तर प्रदेशात गुन्हा नोंद झाला असून पुढील कारवाईसाठी लखनौ येथून पोलीस मुंबईत आले आहेत.

कुतुब मीनार कुतुबुद्दीन ऐबक याने बांधल्याचे पुस्तकातून शिकवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.कडे त्याविषयी पुरावे नाहीत !

कुतुब मीनार ही वास्तू हिंदूंची असून याचे नाव ‘विष्णुस्तंभ’ आहे, हे विविध इतिहासकारांनी पुराव्यानिशी समोर आणले आहे. सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आल्याने आता केंद्र सरकारने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे !