गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्याचा आरंभ !

आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणार्या कार्तिक वारीस टाळ-मृदंगाचा निनाद आणि ब्रह्मवृंदांच्या अखंड मंत्रोच्चारात गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने आरंभ झाला. विधीवत पूजन झाल्यानंतर माऊलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा मालक यांच्या वतीने नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी पालखी सोहळा मालक ह.भ.प. बाळासाहेब आरफळकर, ह.भ.प. राजाभाऊ आरफळकर आदींसह आळंदीकर ग्रामस्थ आणि भाविकभक्त बहुसंख्येने उपस्थित होते. कार्तिक कृष्ण अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे.
मुख्य कार्तिक एकादशीचा सोहळा मंगळवार, २६ नोव्हेंबरला होणार असून पवमान अभिषेक, महापूजा मध्यरात्री १२ नंतर चालू होईल. दुपारी १ वाजता पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा मंदिरात प्रवेश करेल. बुधवारी द्वादशीला शासकीय पंचोपचार पूजा होऊन दुपारी रथोत्सव साजरा होईल. गुरुवारीही पवमान महापूजा होऊन सकाळी आणि सायंकाळी कीर्तन सेवा होईल आणि त्यानंतर मुख्य समाधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !