वाहनचालकांची ‘ए.आय.’च्या तंत्रज्ञानाने पडताळणी होणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

‘ए.आय.’च्या (कृत्रिम बुद्धीमत्ता) साहाय्याने मद्य आणि अमली पदार्थ सेवन करून गाडी चालवणार्‍यांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण न्यून करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

महामार्गावरील अपघाताला पथकर नाका प्रशासन उत्तरदायी ! – प्रकाश गवळी

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ९ मार्चाला ट्रक आणि चारचाकी यांच्या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला. त्याला आनेवाडी पथकर नाका प्रशासन, तसेच महामार्ग पोलीस उत्तरदायी आहेत.

Govt Announces “Cashless Treatment” : रस्ते अपघातातील घायाळांवर विनामूल्य उपचार ; सरकार दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च उचलणार !

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना या महिन्यापासून, म्हणजेच मार्च २०२५ पासून दीड लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळतील. खासगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल.

अलिबाग (रायगड) येथील समुद्रात मासेमारांच्या नौकेला आग !

अलिबाग येथील समुद्रातच २८ फेब्रुवारीला पहाटे ३ ते ४ च्या सुमारास मासेमारांच्या नौकेला आग लागली. या आगीत नौका ८० टक्के जळली.

खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

राज्यात अवैधरित्या होणारी खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनीकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणावेत, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Attack On Nazia Elahi Khan : महाकुंभाला जाणार्‍या भाजपच्या नेत्या नाझिया इलाही खान यांच्यावर मुसलमानांकडून आक्रमण

खान यांच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून घडवून आणला अपघात
खान आणि त्यांची मैत्रिण घायाळ

लोटे औद्योगिक वसाहतीत वायूगळती झाल्याने खळबळ

वायूगळती आटोक्यात आणण्यासाठी लोटे औद्योगिक क्षेत्राची अग्नीशमन यंत्रणा आणि तंत्रज्ञ तातडीने घटना स्थळी पोचले. सायंकाळी विलंबाने वायूगळती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.

‘कार्डियाक अरेस्‍ट’ झालेल्‍या रुग्‍णांसाठी ‘कोल्‍स – कॉम्‍प्रेशन ओन्‍ली लाइफ सपोर्ट’ ही ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ची (‘हृदय-पुनरुज्‍जीवन तंत्रा’ची) प्रक्रिया म्‍हणजे एक संजीवनी !

जोपर्यंत रुग्‍णाचा श्‍वास आणि हालचाल चालू होत नाही, तोपर्यंत, तसेच पुढील वैद्यकीय सुविधा मिळण्‍यासाठी रुग्‍णालयात हस्‍तांतरण करीपर्यंत छातीदाबन चालू ठेवणे आवश्‍यक आहे.

Delhi Railway Station Stampede : नवी देहली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ प्रवासी ठार !

चेंगराचेंगरीच्या वारंवार घडत असलेल्या घटना पहाता यामागे काही षड्यंत्र आहे का, हे पडताळण्यासह भारतीय जनतेतील बेशिस्तपणालाही उत्तरदायी धरले पाहिजे ! यासमवेत अशा घटना घडू नयेत, यासाठी उत्तरदायी अधिकार्‍यांवर कठोरात कठोर कारवाईही झाली पाहिजे !