गोवा : कला अकादमीतील एका ‘फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळला !

या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे, हे भाजपच्या विकसित भारताचे ‘मॉडेल’ आहे.’’

Goa Unseasonal Rains : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या गोमंतकियांना पावसामुळे दिलासा

या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.

Mainpuri Accident : मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथील भीषण अपघातात ४ महिला ठार !

नामकरण सोहळ्याला उपस्थित राहून परतलेले महिला-पुरुष हे या ट्रॉलीतून प्रवास करत होते. वाटेत हा अपघात झाला.

Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्‍याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

एका फिटनेस कारखान्याचा इनव्हर्टर चालू झाल्यामुळे त्याचा वीजप्रवाह वीज कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत आला. त्यामुळेच वीज कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण चौकशीअंती वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहे.

ओडिशात पुलावरून बस कोसळल्याने ५ जण ठार, तर ४० जण घायाळ

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१६ वरील बाराबती पुलावरून बस कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.

श्रीनगर येथे झेलम नदीत नौका उलटून ६ जणांचा मृत्यू

श्रीनगर येथे बटवारा भागात झेलम नदीत १६ एप्रिलच्या सकाळी नौका उलटून झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. या नौकेतून ११ जण प्रवास करत होते.

कात्रज येथे आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू !

कात्रज परिसरात ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’मध्ये वडिलांसोबत गेलेल्या गणेश पवार या ८ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत् पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Haryana School Bus Accident : महेंद्रगड (हरियाणा) येथील शाळेच्या बसच्या अपघाताच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह ३ जणांना अटक

येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते.

Haryana School Bus Accident : हरियाणात खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर १५ मुले घायाळ  

ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.

नागपूर येथे भरधाव कंटनेरच्या धडकेत १२ वाहनांची हानी !

७ एप्रिलच्या रात्री शहरातील मानकापूर परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनरने सिग्नलच्या ठिकाणी उभ्या असलेल्या १२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली.