भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !
मागील लोकसभा निवडणुकीत खोट्या कथानकांचा हिंदु मतदारांवर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्या ‘काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’, असे खोटे कथानक पसरवले जाते; पण देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस पक्षही उत्तरदायी आहे, हे सांगितले जात नाही.