अमेरिकेतील सत्तापरिवर्तन आणि भारत !

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन शपथ घेत आहेत. यापुढे जागतिक महासत्तेची सर्व सूत्रे बायडेन यांच्या हाती असतील. त्याचबरोबर मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या उपराष्ट्रपती पदावर आरूढ झाल्या आहेत, म्हणजे त्या जागतिक महासत्तेच्या क्रमांक दोनच्या सर्वाधिक शक्तीशाली नेत्या असतील.

‘टुकडे आणि तैमुर गँग’ला दणका !

जे.एन्.यू. विद्यापिठातील कित्येक अपप्रकार आणि देशद्रोही वातावरण दाखवण्याचे धैर्य या मालिकेच्या निर्मार्त्यांमध्ये नाही. कलेच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांच्या विडंबनासमवेतच आता देशद्रोही विचारसरणीचा उदो उदो दाखवण्याची नवरूढी चित्रपट आणि वेब सिरीज यांत निर्माण झाली आहे. 

‘ख्रिस्ती गावां’चा धोका !

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींना लाथ मारणार्‍या प्रवीण चक्रवर्ती या पाद्य्राला आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केली. या पाद्य्राने राज्यात ६९९ ‘ख्रिस्त व्हिलेज’ नावाची गावेही बनवली आहेत. या पाद्य्राचे नाव ‘प्रवीण चक्रवर्ती’ आहे. याचा अर्थ कधी तरी प्रवीण चक्रवर्ती किंवा त्याचे पूर्वज यांनी धर्मांतर केले असावे.

मालवणी ‘इस्लामी’ होणार ?

भारतात धर्मांधांकडून हिंदू मार खात आहेत. यात हिंदूंची निष्क्रीयता कारणीभूत असली, तरी त्याहून पोलिसांची निष्क्रीयता अधिक गंभीर आहे.

माहितीच्या स्रोतावर नियंत्रण हवे !

विकीपिडियासारख्या जगात पुष्कळ लोकप्रिय असलेल्या माध्यमांचे महत्त्व या पार्श्‍वभूमीवर वाढत असले, तरी त्यांना पूर्वग्रहाची झालर असल्याचे लक्षात येते. त्याच दृष्टीने ते विषयाची मांडणी करत असल्यामुळे अपकीर्तीच अधिक होते.

पुरस्कार आणि तिरस्कार !

बौद्धिक क्षेत्रात वावरणार्‍यांना स्वतःच्या बुद्धीवर अधिक विश्वास असतो. समोर घडणारे वास्तव, त्याची पाळेमुळे स्वीकारण्याचे औदार्य त्यांच्यात नसते. त्यामुळेच साहित्यक्षेत्रात आज धर्मद्रोही आणि विद्रोहीच विचार अधिक प्रमाणात आढळून येतो. मनोहर आणि त्यांनी नाकारलेला पुरस्कार हे त्याचे केवळ प्रतीक आहे !

न्यायाच्या प्रतीक्षेत रामसेतू !

भारतीय पुराणशास्त्रानुसार सीतामातेच्या शोधार्थ रामेश्वरम् ते श्रीलंका असे जाणार्‍या श्रीरामाने वानरांच्या साहाय्याने दिव्य असा हा सेतू उभारला होता आणि रावणावर स्वारी केली होती, अशी त्याची महती आहे. अशा आशयाचे अनेक संदर्भ मिळाले, तरी तथाकथित धर्मवाद्यांना ‘हा रामसेतू खरा आहे कि खोटा ?’, असा प्रश्न पडतोच.

खोट्या इतिहासाचे सत्य !

शिक्षणक्षेत्रात पालट करण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणावी लागेल. मुळात अशा राज्यव्यवस्थेमध्ये केवळ शिक्षणव्यवस्थाच नाही, तर संपूर्ण आमूलाग्र पालट करण्याची शक्ती असणार आहे. त्यात शिक्षणक्षेत्रासह अर्थ, संरक्षण, प्रशासन, न्यायपालिका, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत रामराज्याप्रमाणे स्थिती निर्माण करण्यासाठी पालट केले जातील.

सामाजिक न्याय !

याच देशात मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी प्रभु श्रीराम यांनीही राज्य केले आहे. आदर्श राज्यकारभाराचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला आहे. कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे सध्याचे राजकारणी ? यावरून तरी देशात रामराज्याची अर्थात् हिंदु राष्ट्राची का आवश्यकता आहे, ते लक्षात येते !

हिंदुद्वेषाची अडगळ !

हिंदु समाजात घडणार्‍या अयोग्य गोष्टी, अपप्रकार, दांभिकता सांगू नये, असे अजिबात नाही; पण ते सांगण्याची लेखकाची पद्धत अशी होते की, कुणाही युवा पिढीतील वाचकाला ‘हिंदु धर्मच वाईट आहे’, असे सहज वाटू शकेल. त्याला आक्षेप आहे आणि राहील.