‘नार्काेटिक’ युद्ध !

‘नार्काेटिक’ युद्ध !

अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !

स्टॅलिन यांचा हिंदीद्वेष !

स्टॅलिन यांचा हिंदीद्वेष !

केंद्र सरकारने हिंदीविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि हिंदीला विरोध असणार्‍या राज्यांमध्ये जनमत घ्यावे, तेथील स्थानिकांना व्यक्त होऊ द्यावे. हिंदीची मागणी असणार्‍यांना हिंदी भाषा शिक्षण उपलब्ध करावे. एकूणच काय हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावण्यासाठी सर्वांचीच मानसिकता पालटणे आवश्यक आहे.

यशस्वी परराष्ट्रनीतीचे शिलेदार !

यशस्वी परराष्ट्रनीतीचे शिलेदार !

‘भारताने आपल्याला साहाय्य करावे, अशा याचकाच्या भूमिकेत अनेक राष्ट्रे असणे’, ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट ! भारताची युद्धसज्जता, शस्त्रांविषयीचे करार, मैत्रीपूर्ण ठरणारे विदेश दौरे, आंतरराष्ट्रीय हितसंबंध, शत्रूंविरोधात केलेले ‘स्ट्राईक’ हे सर्व पहाता भारत जगातील ‘सर्वाेच्च महासत्ता’ होण्याच्या दिशेकडे मार्गक्रमण करत आहे, हे नक्की !

वैचारिक आतंकवादी !

वैचारिक आतंकवादी !

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात….

मनाच्या आजारावर साधनेची मात्रा !

मनाच्या आजारावर साधनेची मात्रा !

भारताला असणारी आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता, मनोविकार जडलेल्यांसाठी वैद्यकीय औषधोपचारांसह साधनेचीही मात्रा आवश्यक अन् क्रमप्राप्त आहे. असे केल्यास मने सुमने होतील आणि ती आनंदाने डोलून त्यांचा सुगंध सदासर्वकाळ दरवळत राहील !

अवसानघातकी मिरवणुका !

अवसानघातकी मिरवणुका !

धर्मांध मुसलमान आता ‘सर तन से जुदा’ धमकीच्या माध्यमातून केवळ समाजात दहशत निर्माण करत नाहीत, तर पुढे त्याची कृतीही करत आहेत. आता मिरवणुकांतून उघडपणे हिंदूंना मारण्याच्या घोषणा झाल्या, तर पुढे हिंदूंना किती कठीण काळ आहे, हे लक्षात घेता आले पाहिजे.

अणूयुद्धाचा धोका !

अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबचा वापर जर झालाच, तर विनाशाखेरीज काहीच या पृथ्वीवर नसणार, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो टाळण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेच जगालाही वाटत आहे. मोदी यांनी एक पाऊल टाकले होते आणि त्यांनी आणखी एक पाऊल टाकावे, हे जगाच्या भल्यासाठी योग्य ठरेल.

मुलायम !

मुलायम !

मुलायमसिंह समाजवादीपेक्षा ‘कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारी व्यक्ती’ म्हणून हिंदूंच्या लेखी त्यांची ओळख असणार, यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिल्याविषयी कधीही क्षमायाचना केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

हिंदुत्व तोडो यात्रा… !

हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !