(अज्ञानी) पुरुष !

(अज्ञानी) पुरुष !

‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल ! आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह !

‘नोबेल’ पुरस्काराचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ !

‘नोबेल’ पुरस्काराचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ !

खोट्या बातम्या देणार्‍या जुबेर याचे नामांकन ! दुर्दैवाने भारतातही या ‘नोबेल’च्या वृत्तांना आणि तो मिळालेल्या व्यक्तींना वारेमाप प्रसिद्धी मिळते. यापुढील काळात हिंदूंना ‘नोबेल’चा पक्षपातीपणा जाणून घेऊन त्यांचा ‘हिंदुविरोधी अजेंडा’ हाणून पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील !

जागतिक ‘भारतीय’ फुटबॉलपटू !

जागतिक ‘भारतीय’ फुटबॉलपटू !

क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे धाडसीपणाचे ठरू शकेल; परंतु सुनील छेत्री यांनी केलेली नेत्रदीपक कामगिरी हा खेळाच्या क्षेत्रातील वास्तविक पुरुषार्थ आहे, हे निश्चित ! भारताला क्रीडा क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी शासनकर्त्यांनी देशात ‘क्रीडा संस्कृती’ रुजवणे आवश्यक !

‘विजयी भव ।’

‘विजयी भव ।’

स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी शारीरिक स्तरावर सक्षम होण्याचे, मानसिक स्तरावर संघर्ष पचवून उभारी घेण्याचे अन् आध्यात्मिक स्तरावर भगवंताच्या अनुसंधानाचे यत्न अविरत चालू ठेवण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर आरंभ करूया अन् हिंदूंची विजयगाथा पुन्हा एकदा काळाच्या पटलावर सुवर्णाक्षरात कोरण्यासाठी सिद्ध होऊया !

मुंबईवरील संकट !

मुंबईवरील संकट !

धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

भारताच्या विकासाचा ‘५ जी स्पीड’ !

भारताच्या विकासाचा ‘५ जी स्पीड’ !

तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये ५ क्रमांकावर पोचली. भविष्यात भारताला महासत्ता बनवण्यामध्ये ‘टेलिकॉम’ क्षेत्राची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरेल !

‘गझवा-ए-हिंद’ कि हिंदु राष्ट्र ?

‘गझवा-ए-हिंद’ कि हिंदु राष्ट्र ?

जिहादी मानसिकता बाळगून आतंकवादाचे समर्थन करणार्‍या संघटनेवर बंदी घातल्याने ‘इस्लामी कट्टरतावादाला धक्का लागण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे’, असे म्हणता येईल; पण याची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत. मुळात आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे.

सांस्कृतिक प्रसाराचे सूर !

सांस्कृतिक प्रसाराचे सूर !

एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !

हिजाब आंदोलन !

हिजाब आंदोलन !

जगभरातील हिजाबविरोधी आंदोलनातून भारतातील धर्मांध मुसलमान धडा घेणार का ? हिजाबची बळजोरी करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची वेळ भारत सरकारने आणली आहे; परंतु हिजाबवर बंदी घालण्याचा विचार भारतातील मुसलमान करतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे !