उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके ।
मी आर्तभावाने करते तुला विनम्र याचना । उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके।।
मी आर्तभावाने करते तुला विनम्र याचना । उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके।।
मी मागील १७ वर्षांपासून देवद आश्रमात रहात आहे. आता ‘येथील भूमीचे भाग्य उजळू लागले आहे’, असे मला वाटते. महर्षि, ऋषिमुनी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्या कृपेमुळेच हे शक्य होत आहे. त्यांच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक प्रणाम !
श्री बगलामुखीदेवीची आरती चालू असतांना मी डोळे मिटून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची मानस आरती करत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’