संकेतस्थळावरील नादुरुस्त ‘तक्रार निवारण प्रणाली’ हटवून त्याजागी तक्रारीसाठी ‘आपले सरकार’ची लिंक उपलब्ध !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे  प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील नादुरुस्त ‘तक्रार निवारण प्रणाली’ हटवून त्याजागी आता प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ‘आपले सरकार’ या अ‍ॅपची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच १० लाखांहून अधिक मतदार आढळले मयत !

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यात चालू असलेल्या मतदार सर्वेक्षणात मयत मतदारांची संख्या १० लाख ८५ सहस्र १९५ इतकी आढळली आहे.

(म्हणे) ‘सनातन धर्मावर बोलल्यामुळे एका मुलाला जाणीवर्पूक लक्ष्य केले जात आहे !’ – अभिनेते कमल हासन

उदयनिधी यांनी जाणीवपूर्वक सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे, याकडे कमल हासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत !

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍य करणार्‍या नेत्‍यांवर कारवाई करा !

तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा या तिघांवरही द्वेषमूलक वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात यावा आणि त्‍यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी.

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे ध्वनीक्षेपकावर श्री गणेशाची आरती लावल्याने धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकणारे या घटनेविषयी बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा !

मुझफ्फरपूर (बिहार) येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू !

बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !

बस्ती (उत्तरप्रदेश) येथे घरात घुसून महिलेवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

पंजाबमध्ये पाकमधून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेले साडेतीन कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त !

पाकिस्तानच्या एका ड्रोनने पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पंजाब पोलिसांच्या सहकार्याने त्याचा शोध घेऊन हे ड्रोन कह्यात घेतले. या ड्रोनमध्ये हेरॉईन ठेवण्यात आले होते.

देशात ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ गाड्यांना प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्यांमध्ये धावणार आहेत.