देशात ९ नवीन ‘वन्‍दे भारत एक्‍सप्रेस’ गाड्यांना प्रारंभ

या रेल्‍वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्‍थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्‍यांमध्‍ये धावणार आहेत.

नाशिक येथे रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार, गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची लूटमार !

बाजारात रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी रफिक हा गरजू प्रवाशांना हेरून त्यांची फसवणूक करत होता.

पोलिसांनी चकमकीत अनिश याला केले ठार, तर दोघे घायाळ !

अयोध्या येथे ३० ऑगस्ट या दिवशी धावत्या रेल्वेगाडीमध्ये महिला पोलीस हवालदारावर आक्रमण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींपैकी एकाला पोलिसांनी चकमकीत ठार केले, तर २ जणांना अटक करण्यात आली.

मुंबईत लोकलमध्ये अश्‍लील नृत्‍य करणार्‍या तरुणीच्‍या व्‍हिडिओवर मुंबईकर संतापले

लोकलमध्ये एका तरुणीचा ‘बेली डान्‍स’ नावाचा अश्‍लील नृत्‍यप्रकार करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित होत आहे. प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी तरुण-तरुणी अशा प्रकारच्‍या गोष्‍टी हल्ली मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या व्‍हिडिओवर मुंबईकरांनी जोरदार संतप्‍त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २४ डब्‍यांच्‍या गाड्या धावणार

शहर आणि उपनगरे येथे वाढणारी गर्दी लक्षात घेता २४ डब्‍यांची रेल्‍वेगाडी करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) येथील रेल्वेस्थानकात सुविधा द्या ! – किर्लाेस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना 

सांगली जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांसाठी, तसेच पलूस, तासगाव, कडेपूर, खानापूर आणि वाळवा या तालुक्यांतील गावांसाठी किर्लोस्करवाडी हे नजीकचे अन् सोयीचे रेल्वेस्थानक आहे. सद्यःस्थितीत या स्थानकावर केवळ २ ‘पॅसेंजर’ आणि ३ जलद (एक्सप्रेस) गाड्यांना थांबा आहे. अ

‘सातारा-कोल्हापूर’ पॅसेंजर गाडीची ब्रेकिंग यंत्रणा निकामी झाल्याने गाडी दीड घंटे विलंबाने !

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सहस्रो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली ‘सातारा-कोल्हापूर’ पॅसेंजर सध्या प्रवाशांची परीक्षा पहात आहे. ८ सप्टेंबरला गाडीची ‘ब्रेकिंग यंत्रणा’ निकामी झाल्याने ती हातकणंगले स्थानकात बराच काळ थांबली.

अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आदी देशांना एकमेकांना रेल्वेने जोडण्यावर होणार चर्चा !

अमेरिका, भारत, सौदी अरेबिया आणि अन्य काही देशांचे नेते रेल्वेमार्ग आणि बंदर यांच्या माध्यमांतून एकामेकांना जोडण्याच्या संदर्भात मूलभूत सुविधांवर चर्चा करणार आहेत.

कल्‍याण येथे मध्‍य रेल्‍वेच्‍या सिग्‍नलमधील बिघाडामुळे वाहतूक खोळंबली !

कल्‍याण येथे मध्‍य रेल्‍वेच्‍या सिग्‍नल यंत्रणेत २९ ऑगस्‍टला सकाळी बिघाड झाल्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथून कोकणात जाण्यासाठी ३ विशेष रेल्वे गाड्या

मुंबईवरून जाणार्‍या रेल्वेसाठी आतापर्यंत १ लाख ४ सहस्र गणेशभक्तांची तिकिटांची निश्चिती (कन्फर्म) झाली आहे.  त्या माध्यमातून रेल्वेला ५ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.