भारताने बांगलादेशाला रेल्वे प्रकल्पासाठी देण्यात येणारा ५ सहस्र कोटी रुपयांचा निधी थांबवला

हा निर्णय घेण्यासाठी भारताला इतका वेळ का लागला ? असे आणखी किती प्रकल्प आणि योजना बांगलादेशासमवेत आहेत ज्या भारताने रहित करणे आवश्यक आहेत ?

रेल्वे ट्रॅकवर महिलेचा मृतदेह सापडला !

धावत्या रेल्वेतून ही बॅग फेकण्यात आली होती. सध्या पोलीस तांत्रिक अन्वेषणाच्या आधारे हत्या करणार्‍या आरोपीचा शोध घेत आहेत.

माधवनगर (जिल्हा सांगली) येथे रेल्वेचे नवीन टर्मिनल उभे करण्याची प्रवासी आणि व्यापारी यांची मागणी !

जिल्ह्यातील माधवनगर येथे रेल्वेच्या मालकीची जागा उपलब्ध असल्याने प्रवासी आणि व्यापारी यांच्या लाभासाठी ‘या जागेवर ५ प्लॅटफॉर्मचे नवीन सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल उभे करावे’, अशी मागणी सांगली जिल्ह्यातील प्रवासी आणि व्यापारी वर्गातून होत आहे.

ATM In Panchavati Express : पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम् यंत्र उपलब्ध !

हा रेल्वेचा देशातील पहिलाच प्रयोग आहे. हे एटीएम् यंत्र नाशिकमधील मनमाड ते मुंबई धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आले आहे.

पुणे येथून ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा’ ही विशेष रेल्वे सोडणार !

‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आय.आर्.सी.टी.सी.) चालू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेअंतर्गत ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा गुरुकृपा’सह ही विशेष रेल्वे येत्या १७ एप्रिलपासून पुणे येथून सोडण्यात येणार आहे.

मेट्रो, मोनो, लोकल रेल्वे आणि बेस्ट यांच्यासाठी एकच तिकीट !

मुंबई मेट्रो, मोनो, लोकल रेल्वे आणि बेस्ट यांसाठी ‘मुंबई १’ हे कार्ड चालणार आहे. येत्या एक महिन्यात हे कार्ड चालू केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी ११ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

रेल्वे आरक्षण ‘ई-तिकिटा’चा अवैध काळाबाजार प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर पाटील याला अटक !

पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहारप्रकरणी संशयास्पद युजर आयडी वापरून तिकीटे बनवणार्‍या ज्ञानेश्वर गुलाब पाटील याला अटक केली आहे. त्याच्याकडून २४३ ई-तिकिटे जप्त करण्यात आली असून त्याचे मूल्य ४ लाख २० सहस्र ९६२ रुपये इतके आहे.

महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करा !

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भविष्यातील प्रकल्पांसाठी, तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.