पुढील ४ ते ६ मासांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होणार ! – बिल गेट्स यांची चेतावणी

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड एवेल्यूएशनच्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये कोरोनामुळे २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. मास्क लावण्यासारख्या इतर नियमांचे पालन केल्यास मृत्यूचा हा आकडा अल्प होऊ शकतो.

सुरूंग स्फोटांमुळे हानी झालेल्यांना हानीभरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करू ! – निगुडे ग्रामस्थांची चेतावणी

खनिजांच्या अतीउत्खननामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संबंधित उपाययोजना प्रशासनाने स्वतःहून करायला हव्या होत्या ! प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

कोरोनाच्या संकटातही चीनच्या निर्यातीमध्ये २१ टक्क्यांची वाढ !

जगाला कोरोनाच्या संकटात चीनने टाकले, असे म्हटले जात असतांना चीनच्या व्यापारामध्ये होणारी वाढ त्याच्यावरील संशय वाढवते !  

गेल्या ११ मासांत काश्मीरमध्ये २११ आतंकवादी ठार : ४७ जणांना अटक

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी पाकमध्ये त्यांची घाऊक निर्मिती चालू आहे. हे पहाता येथील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले पाहिजे !

पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात केलेल्या २ सहस्र ३ चाचण्यांमध्ये ११७ कोरोनाबाधित आढळले आहेत.

देशभरात वाढलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे, हा गंभीर प्रश्‍न !

वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

३९ टक्के लाचखोरीचा दर असलेला भारत आशिया खंडातील सर्वाधिक भ्रष्ट देश !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे !

‘कोरोना’रूपी भ्रष्टाचार !

लाचखोरी आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रामाणिक लोकांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजमनावर धर्मशिक्षणाचे संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी संघटित होऊन याविरोधात लढा दिला, तर यश मिळू शकते, तसेच अशा लढ्याला ईश्‍वरी अधिष्ठान असेल, तर यश निश्‍चित !

भारताची लज्जास्पद स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.