चैत्र एकादशीला पंढरपूर येथील दर्शनवारीत स्थानिक सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप !

केवळ मुखदर्शन आणि उन्हामुळे त्रस्त असलेल्या वारकर्‍यांना मंदिर समितीच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसत होता. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला वेळ लागत होता, काही सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप होत आहे.

Ayodhya Flowers Under Protection : श्रीराममंदिराच्या परिसरातील सजावटीच्या फुलांनाही दिवस-रात्र ‘कडेकोट संरक्षण !’

अयोध्यानगरीमध्ये २२ जानेवारी या दिवशी होत असलेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिराचा संपूर्ण परिसर झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला आहे. मंदिराकडे जाणार्‍या मुख्य मार्गापासून ते मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या भिंतींवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.

Ayodhya Security Arrangements : अयोध्येत २५ सहस्र सैनिक तैनात करणार – सुरक्षाव्यवस्थेवर १०० कोटी रुपये खर्च !

आत्मघातकी आक्रमणे रोखण्यासाठी मंदिराभोवती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संरक्षणव्यवस्था सिद्ध करण्यात येत आहे. मंदिराचा परिसर सीसीटीव्हीने सुसज्ज केला जात आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुरक्षा कर्मचार्‍यांची संख्या अजूनही वाढू शकते.

वर्धा येथे तृतीयपंथीयांच्या वेशातील ६ जणांनी रेल्वेतील १० प्रवाशांना लुटले !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा घटना घडतात !

संसदेतील घटनेचे महाराष्ट्राच्या विधीमंडळात पडसाद; अभ्यागतांना प्रवेश बंद !

लोकसभेतील घटनेनंतर तात्काळ येथील विधीमंडळाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यासंबंधी सुरक्षारक्षकांना तात्काळ चोख सुरक्षा पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Increasing Crimes Against Tourists : गोव्यात हॉटेल व्यावसायिक, दलाल आणि ‘बाऊंसर’ यांच्याकडून पर्यटकांना लुटण्याच्या वाढत्या घटना !

पर्यटकांना दारू प्यायला देतात आणि त्यांची नशा चढल्यानंतर ‘बाऊंसर’च्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण

रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण करणार्‍यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा, अन्यथा सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू’, अशी चेतावणी सुरक्षारक्षकांच्या वतीने देण्यात आली आहे.

मणीपूर येथे आंदोलकांचे राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर आक्रमण !

राज्यातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी मूलगामी उपाय न काढल्यानेच हिंसाचार पुन:पुन्हा डोके वर काढत आहे, हेच अशा घटनांतून म्हणता येईल !

मुंबईमध्‍ये १ लाख गणसेवक करणार गणेशोत्‍सवाची सुरक्षा !

मुंबई पोलीस आणि ‘बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समिती’ यांच्‍यात झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

मणीपूरमध्ये नव्याने झालेल्या हिंसाचारात ३ जण ठार !

मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि जमावात गेल्या २४ घंट्यांपासून चकमक चालू आहे. या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युमनम जितेन मैतेई (४६), युम्नाम पिशाक मैतेई  (६७) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (३९) यांचा समावेश आहे.