मुंबईमध्‍ये १ लाख गणसेवक करणार गणेशोत्‍सवाची सुरक्षा !

मुंबई पोलीस आणि ‘बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समिती’ यांच्‍यात झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

मणीपूरमध्ये नव्याने झालेल्या हिंसाचारात ३ जण ठार !

मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि जमावात गेल्या २४ घंट्यांपासून चकमक चालू आहे. या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युमनम जितेन मैतेई (४६), युम्नाम पिशाक मैतेई  (६७) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (३९) यांचा समावेश आहे.

मुलींच्या वसतीगृहांच्या ठिकाणी महिला सुरक्षारक्षक नियुक्ती करण्याला प्राध्यान्य देणार ! – शंभूराज देसाई, मंत्री

जेथे मुलींची वसतीगृहे आहेत, तेथे महिला प्रबंधक  नियुक्त करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. वसतीगृहात सुरक्षारक्षकांची नियुक्ती बाहेरील एजन्सींकडून करण्यात येते.

विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीकोनातून शाळेच्‍या बसचालकांनी नियमावलीचे काटेकोर पालन करावे ! – पोलीस आयुक्‍त रितेश कुमार

शालेय विद्यार्थ्‍यांची वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीकोनातून विद्यार्थ्‍यांची वाहतूक करणार्‍या बसचालकांनी बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे पोलीस आयुक्‍त रितेश कुमार यांनी सांगितले.

देहलीत दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर चोरांनी लुटले २ लाख रुपये !

राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !

(म्हणे) ‘पुलाच्या बांधकामात त्रुटी राहिल्याने तो पाडला !’ – तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री

शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यंत बिहारमधील राजद आणि जनता दल (संयुक्त) यांचे सरकार झोपले होते का ?

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : १० जणांचा मृत्यू, तर ४०० घरे पेटवली

मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला.

पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले !

काश्‍मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्‍ट करण्‍यासाठी पाकला नष्‍ट करा !

आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित ठेवण्‍याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्‍यशासनाला सादर !

आतंकवादी आक्रमण, तसेच अन्‍य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्‍णालये, पंचतारांकित हॉटेल्‍स, शाळा, देवस्‍थाने आदी अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित कशा ठेवव्‍यात ? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने  राज्‍यशासनाकडे सादर केला आहे.

बंगाल पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण करा ! – कोलकाता उच्च न्यायालय

मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले.त्या वेळी न्यायालयाने असा प्रश्‍न विचारला.