गिरोडा गावात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण

बिबट्यांची समस्या सुटण्यासाठी सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन तत्परतेने उपाययोजना का काढत नाही ?

वर्ष २०२४ मध्ये २७५ किलो अमली पदार्थ जप्त, तर १८८ जणांना घेतले कह्यात

वर्ष २०२४ मध्ये अमली पदार्थ व्यवहारावरून गोव्यात सरासरी २ िदवसांतून एकदा एका व्यक्तीला कह्यात घेण्यात आले आहे. या काळात गोवा पोलिसांनी १० कोटी रुपये किमतीचे २७५ किलो अमली पदार्थ जप्त केले असून १८८ जणांना कह्यात घेतले.

गोव्यातील ६८७ प्राथमिक शाळांपैकी ११८ शाळांमध्ये १० हून अल्प विद्यार्थी

शिक्षण खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी घटतच चालल्याचे समोर आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात चालू असलेल्या ६८७ सरकारी प्राथमिक शाळांपैकी ११८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० हून अल्प आहे.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मांद्रे येथे डोंगराळ भागाला लागली मोठी आग

कायद्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तरीही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मांद्रे मतदारसंघातील समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली.

‘सनबर्न’मधील युवकाचा मृत्यू अमली पदार्थांच्या सेवनामुळेच !

धारगळ येथे सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवात २८ डिसेंबर या दिवशी देहलीस्थित युवक करण कश्यप याचा मृत्यू झाला होता.

नवी मुंबईत दारू पिऊन वाहन चालवणार्‍या २६६ जणांवर कारवाई !

दारू पिऊन वाहन चालवणार्‍या ३२ जणांवर सर्वांत अधिक कारवाई तुर्भे विभागाच्या वाहतूक शाखेने केली. गव्हाण फाटा वाहतूक शाखेने सर्वांत अल्प म्हणजे केवळ ५ जणांवर कारवाई केली. 

बजरंग दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८३ जणांचे रक्तदान !

रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास बजरंग दलाच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र-छावा’, हे पुस्तक आणि बजरंग दलाची दिनदर्शिका भेट देण्यात आली.

भाडळे (सातारा) येथील सैनिक प्रकाश खरात यांना वीरमरण !

३० डिसेंबर या दिवशी अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावावर शोककळा पसरली.

घरपट्टी वाढीविषयी पालिका आणि नगरपंचायती यांना आदेश !

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, घरपट्टीवाढीविषयीचे आदेश कार्यालयीन आणि आर्थिक शिस्तीस अनुसरून आहेत. त्यामुळे घरपट्टी वाढीविषयीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन समारंभ ७ जानेवारीला ! – सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त

नवी मुंबई महानगरपालिकेचा ३३ वा वर्धापनदिन समारंभ १ जानेवारी ऐवजी ७ जानेवारी या दिवशी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.