|

वॉशिंग्टन (अमेरिका) – येथील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये स्वातंत्र्याविषयी भारताला देण्यात आलेले गुण ७१ वरून न्यून करून ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या सूचीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच भारताची ५ स्थानांनी घसरण झाली आहे. नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि स्वातंत्र्य हे वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचा दावा ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने केला आहे. मुसलमानांवर होणारी आक्रमणे, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने कोरोना परिस्थिती हाताळतांना केलेली दळणवळण बंदी या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने म्हटले आहे. मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटल्याचा या अहवालात उल्लेख आहे.

फ्रीडम हाउस रिपोर्ट ‘भारत विरोधी एजेंडे का हिस्सा’: बीजेपी https://t.co/GHIGtSXbAR
— BBC News Hindi (@BBCHindi) March 4, 2021
१. या अहवालात पुढे म्हटले आहे की, मोदी यांच्या हिंदु राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणार्या संस्थांवर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जाणकार आणि पत्रकार यांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणार्या आक्रमणांंचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुसलमानांवर होणारे आक्रमण यांचाही समावेश आहे.
‘फ्रीडम हाउस’ एक अमेरिकी शोध संस्थान है जो हर साल ‘फ्रीडम इन द वर्ल्ड’ रिपोर्ट निकालता है. इस रिपोर्ट में दुनिया के अलग अलग देशों में राजनीतिक आजादी और नागरिक अधिकारों के स्तर की समीक्षा की जाती है.#FreedomHouse #FreedomOfExpression #MediaFreedom https://t.co/hgzkandeMJ
— DW Hindi (@dw_hindi) March 4, 2021
२. जगामध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून फिनलँड, नॉर्वे आणि स्विडन हे पहिल्या स्थानी आहेत, तर सर्वांत अल्प स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये तिबेट आणि सीरिया यांचा समावेश आहे.
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री