भोपाळमध्ये २ शिक्षिकांकडून वर्गातच नमाजपठण !

अशा प्रकारे जर हिंदु शिक्षकांनी वर्गात भगवद्गीता शिकवली असती, तर तथाकथित नास्तिकतावाद्यांनी ‘शिक्षण व्यवस्थेचे भगवेकरण होत आहे’, अशी आरोळी ठोकली असती !

कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाला ! – क्रिस्टोफर व्रे, संचालक, एफ्.बी.आय

कोरोनाच्या उत्पत्तीविषयी आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करत आहोत. यात आम्ही जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्यानुसार कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याची दाट शक्यता आहे, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर अन्वेषण विभागाचे (एफ्.बी.आय.चे) संचालक क्रिस्टोफर व्रे यांनी केला.

घरगुती गॅस सिलिंडरच्या मूल्यात ५० रुपयांची वाढ !

घरगुती सिलिंडरच्या मूल्यामध्ये ५० रुपयांनी वाढ तर व्यावसायिक सिलिंडरच्या मूल्यामध्ये ३५० रुपये ५० पैशांनी वाढ !

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

भारतात अशी घटना घडली असती, तर पोलिसांनी आरोपीला ठार केले नसते ! ऑस्ट्रेलियात नागरिकांच्या जिवाची अधिक काळजी घेतली जाते, हेच यातून लक्षात येते ! धर्मांध कुठेही असले, तरी गुन्हेगारी वृत्तीनुसारच वागतात !

कोरोना नैसर्गिक नव्हता, तर जैविक युद्ध होते ! – श्री श्री रविशंकर

संपूर्ण जगाला कोरोनाशी लढा द्यावा लागला. लोकांना २ वर्षे घरातच रहावे लागले. कोरोनाच्या प्रभावावर मी त्या वेळी म्हणालो होतो की, हा आजार नैसर्गिक नाही. हे काही देश आणि लोक यांचे षड्यंत्र आहे, हे जैविक युद्ध आहे. माझ्या शिष्यांनी मला असे न बोलण्याचा सल्ला दिला होता; कारण त्यामुळे वाद निर्माण झाला असता.

ढाका येथील हिंदूंची मंदिरे आणि घरे केली जात आहेत उद्ध्वस्त !

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या सातत्याच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट नाकारता येत नाही ! पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याच्या मागणीवरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा तहकूब !

खासदार संजय राऊत यांनी ‘विधीमंडळ चोरमंडळ आहे’, या केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.

मराठी भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

या निमित्ताने कवी केशवसूत स्मारक येथे ‘मराठी भाषेचे संवर्धन आणि शासनाची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन तसेच ‘मराठी भाषा संवर्धनासाठी लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.