सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य न दिल्याने आयुक्तांचे त्वरित स्थानांतर करण्याची मनसेची मागणी !

महापालिकेवर प्रशासक म्हणून काम करतांना आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे; मात्र विक्रम कुमार त्यांच्या कार्यकाळात लोकशाहीदिन बंद पडला असून जनता दरबार घेण्यास त्यांना वेळ मिळत नाही.

कोचि (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्तजयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला.

छत्रपती संभाजीनगर येथे कारखान्याला लागलेल्या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू !

वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणार्‍या ‘सनशाईन एंटरप्राईज कारखान्या’त लागलेल्या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४ कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला आहे. ही घटना ३० डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ८५५.२८ कोटी रुपयांच्या वार्षिक योजना आराखड्यास संमती !

जिल्ह्याच्या वर्ष २०२४-२५ च्या प्रारूप विकास आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली.

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांनी घेतलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने पुनर्परीक्षा घेणार !

ही परीक्षा रहित करून जानेवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या सेट विभागाच्या वतीने परीक्षा घेतली जाणार आहे.

१०८ व्या ‘मन की बात’मध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पंतप्रधानांचा भर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमाच्या १०८ व्या भागात राष्ट्राला संबोधित केले. या वेळी त्यांनी ‘फिट इंडिया’ म्हणजे ‘स्वस्थ भारत’ मोहिमेवर भर दिला.

सातारा येथे २ जानेवारीला गिरणी कामगारांचा मेळावा ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

‘‘गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे.

‘लांडगा आला रे आला’ म्हणणार्‍याचा आणि महाविकास आघाडीचा डी.एन्.ए. समान ! – मुनगंटीवार

‘लांडगा आला रे आला’ म्हणणार्‍या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा ‘डी.एन्.ए.’ समान असावा; कारण प्रतिमासाला ते ‘सरकार पडणार’ असे म्हणतात

जालना येथे देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना येथे जात असतांना बदनापूर येथे त्यांना मराठा आंदोलकांनी बसस्थानक परिसरात काळे झेंडे दाखवले. या वेळी ‘फडणवीस परत जावा’, अशा घोषणाही देण्यात आल्या. डोंगरगाव येथील मराठा आंदोलक विष्णु घनघावने यांनी ही घोषणा दिली.

निसर्गाशी एकरूप होण्यासह सामाजिक समरसतेचा आनंद नर्मदेची पायी परिक्रमा देते ! – मिलिंद चवंडके

नर्मदेची पायी परिक्रमा ही खडतर तपश्चर्याच आहे. आपली पूर्वपुण्याई असेल तरच नर्मदा मैय्या पायी परिक्रमा करू देते. परिक्रमा श्रद्धेने केल्यास जीवनातील शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. भारतात देवीची शक्ती उपासना अनेक तपांपासून केली जाते.