मुंबईमध्ये मराठीत पाटी न लावणार्‍या दुकानांना दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार !

मराठी भाषेत नामफलक न लावणार्‍या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.

मालगुंड (रत्नागिरी) येथे ६ आणि ७ एप्रिलला ‘कोमसाप’चे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी राज्यशासनाची समिती पाठपुरावा घेणार !

सेवानिवृत्त भारतीय विशेष सेवेतील निवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यशासनाने १४ मार्च या दिवशी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळा’चे सचिव हे सदस्य म्हणून कार्यरत असतील.

शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर आणि संभाषण बंधनकारक !

अद्ययावत् मराठी भाषा धोरणाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक …

महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा धोरण घोषित !

मराठी भाषा विभागाने १३ मार्च या दिवशी राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित केले. यामध्ये येत्या २५ वर्षांत मराठीला राष्ट्रीय आणि वैश्विक भाषा म्हणून विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.

आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी ! – प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी

संतांनी भाषा जगवली आणि जागवली. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाही आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’ निर्माण केली. तत्कालीन समाजाला हा नवा सामाजिक दृष्टिकोन संतांनी दिला.

दुकानांवरील पाट्या मराठीत न लावणार्‍या दुकानदारांना नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्याची चेतावणी

आता केवळ सूचना, चेतावणी आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून मराठीची गळचेपी थांबवावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !

मराठी गांभीर्याने न शिकवल्यास शालेय शिक्षण विभागाची कारवाईची चेतावणी !

मराठी भाषा शाळांमध्ये नीट शिकवली जाण्यासाठी शिक्षण विभागाला कारवाई करण्याची वेळ येणे हे दुर्दैवी !

मातृभाषेतून आकलन चांगले होते ! – डॉ. सुधीर एम्. देशपांडे

कुसुमाग्रज यांनी त्यांच्या साहित्यातून क्रांतीची प्रेरणा सर्वांच्यात निर्माण केली. त्यांनी मराठी भाषेची थोरवी आपल्या कवितेतून वर्णन केली आहे.

शाळांमध्ये मराठीचे अध्ययन सक्तीचे करण्याविषयीच्या अधिनियमाची काटेकोर कार्यवाही करा !

मराठीची सध्याची दुःस्थिती पहाता केवळ आदेश देऊन चालणार नाही, तर ही कार्यवाही होत आहे का, याचाही पाठपुरावा घ्यायला हवा !