आंध्र नव्हे, ख्रिस्तीप्रदेश !

भाजपने जगनमोहन सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारनेही या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करू शकतो. अन्यथा उद्या आंध्रप्रदेश ‘ख्रिस्तीप्रदेश’ म्हणून ओळखला जाऊ लागला, तर आश्‍चर्य नव्हे !

उद्ध्वस्त मंदिराच्या निमित्ताने… !

गेली ७ दशके पाकमधील मंदिरांना अशा प्रकारे उद्ध्वस्त केले जाणे, ही धर्माभिमानी हिंदूंना नेहमीच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पाकमधील हिंदूंचा हा भयपट संपून त्यांचे निर्भय जीवन जगणे कधी चालू होणार आहे ?

उद्रेक होण्यापूर्वी…!

‘अ‍ॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अ‍ॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की ते आपोआप वठणीवर येतील. त्यांना हीच भाषा समजते !

गोमाता आणि डुक्कर !

भारतासह जगातील काही मुसलमान संघटनांनी दावा केला आहे, ‘कोरोनाची लस बनवतांना त्यामध्ये डुकराची चरबी वापरण्यात आली आहे’, तर भारतात हिंदु महासभेने शंका व्यक्त केली आहे, ‘यामध्ये गोमांसाचा वापर करण्यात आला आहे.’ मुसलमानांनी थेट यावर बहिष्काराचे आवाहन केले आहे.

बलुचिस्तानचा लढा !

भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नेपाळी नाट्य !

नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे.

ब्रेग्झिटचे पडसाद !

ब्रेग्झिट ही युरोपीय देशांसाठी चिंतेची गोष्ट असली, तरी भारताला पारतंत्र्यातील अन्यायाच्या जखमा भरण्यासाठी नियतीने दिलेली मोठी संधी आहे. युरोपीय देशांवर आलेला हा नियतीचा फेरा आहे. त्यांनी जी कर्मे केली, त्यांची फळे ते आज या समस्यांच्या रूपातून भोगत आहेत !

मूलभूत सुविधांचा फार्स !

जे प्राथमिक आहे, तेच होत नाही, तर आंतरिक प्रेरणेने जनतेला काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊन करणे किती दूर आहे ! ते होण्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा, जनतेप्रती प्रेम आणि पालकत्वाची भावना हवी ! तसे झाल्यास न्यायालयाला अशा गोष्टींत लक्ष घालावे लागणार नाही !

ब्रिटनचे ‘पाकिस्तानी ‘ऑफकॉम’!

पाक हा आतंकवाद जोपासणारा, आतंकवादी हाफीज इत्यादींची मानमरातब करणारा, त्यांना संरक्षण देणारा आणि आतंकवादाचे उगमस्थान असणारा, जगभरात आतंकवाद निर्माण करणारा ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहीम यांना पाक वास्तव्याला सुरक्षित ठिकाण वाटत असेल, तर तेथील प्रत्येकाला आतंकवादी म्हटल्यास वावगे काय ?

संधीसाधू काँग्रेस !

एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?