आचारसंहितेसाठी रासायनिक खतांच्या गोणीवरील पंतप्रधानांची छबी मिटवण्याचे कृषि विभागाचे आदेश

रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापण्यात आलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने कृषी विभागाने पंतप्रधान मोदी यांच्या गोण्यांवरील त्या छबीवर ब्रशद्वारे लाल रंग देऊन ती प्रतिमा खोडावी आणि नंतरच गोणी वितरीत करावी, अशा सूचना केली आहे.

Dehli Farmers Agitations : देहलीच्या शंभू सीमेवरून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचा देहलीत घुसण्याचा प्रयत्न !

पोलिसांनी रोखल्यावर त्यांच्यावर दगडफेक होत असेल, तर या आंदोलनात समाजविघातक शक्ती सहभागी आहेत, असेच म्हणायला हवे !

संपादकीय : बलशाली भारताचा अर्थसंकल्प !

अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !

तुरीचे भाव १० सहस्र रुपयांवर गेले !

यंदा तुरीचे उत्पादन अल्प झाले असून सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी आहे.राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर १० सहस्र ४०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले आहेत.आगामी दिवसांत हे भाव सहजपणे ११ ते १२ सहस्रांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज आहे.

२६ ते २९ जानेवारी या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे ‘भीमा कृषी पशू आणि पक्षी प्रदर्शन’ !

या प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक प्रदर्शन कक्षांचा समावेश असून ‘भागीरथी महिला संस्थे’च्या सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांचा यात समावेश आहे.

France : शेतकरी सरकारी कार्यालयांच्या दारावर टाकत आहेत शेतीमाल !

फ्रान्स सरकारने कृषी कायद्यामध्ये काही पालट केले आहेत.यामुळे त्यांची आर्थिक हानी होत असल्याचा त्यांनी दावा केला असून कायदा परत घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.

ऊसतोडणी यंत्राच्‍या अनुदानासाठी संगणकीय सोडत ! – सहकारमंत्री

राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेच्‍या अंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान निधीची राज्‍यस्‍तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्‍यात  येणार असल्‍याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

World Soil Day : मातीतील जैवविविधता नष्ट झाली, तर संपूर्ण सृष्टीचक्र बिघडून जाईल ! – विकास धामापूरकर, शास्त्रज्ञ

असंतुलित रासायनिक खतांमुळे भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे उत्पादित होणारे अन्न विषारी उत्पादित होते. जर प्रत्येक नागरिकाला विषमुक्त अन्न हवे असेल, तर . . .

राज्‍य कृषी मूल्‍य आयोगाच्‍या अध्‍यक्षांना सरकारने दिला मंत्रीपदाचा दर्जा !

राज्‍यातील शेतमालाला योग्‍य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही योग्‍य दरात शेतमाल खरेदी करता यावा, यासाठी राज्‍यशासनाने राज्‍य कृषी मूल्‍य आयोगाची निर्मिती केली आहे.

सरकारला जागे करण्‍यासाठी किसान सभेद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

बीड जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना दुष्‍काळी अनुदान मिळत नाही, तसेच पीक विम्‍याचेही पैसे जमा होत नसल्‍याने किसान सभेने आंदोलनाची चेतावणी दिली होती. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्‍यात आले.