पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कार्यक्रम रहित करण्याची नामुष्की !

‘सुळकूड पाणी योजना कृती समिती’ने पालकमंत्र्यांचा कार्यक्रम झाल्यास काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्याचे घोषित केले होते. यामुळे रुग्णालय प्रशासनाने कार्यक्रम रहित केला.

दुचाकीवरून प्रवास करणार्‍या तिघांना रोखणार्‍या साहाय्यक फौजदाराला धडक !

कायद्याचा धाक नसल्याचा परिणाम ! वाहतुकीच्या संदर्भात बेशिस्त वर्तन करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्‍या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून चोरी !; गृहरक्षकाकडून मारहाण; एकाचा मृत्यू !..

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ चोरांनी घरात एकट्या असलेल्या मुलीचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. घरातून रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे.

Life On Mercury : बुधावरही जीवसृष्टी शक्य ! – नासा

‘प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट’च्या शास्त्रज्ञांनी बुधाच्या पृष्ठभागावर खारट हिमनद्यांचे पुरावे सापडल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत तेथे जीवसृष्टीची आशा निर्माण झाली आहे.

FDA Raids : पुणे येथे अन्न आणि औषध प्रशासनाने टाकल्या ३ दिवसांत ९ ठिकाणी धाडी !

लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी आदींचा साठा शासनाधीन !

परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचे पैसे अन्यत्र फिरवल्याचा आरोप !

हिंदु विधीज्ञ परिषदेचा परिवहन विभागावर गंभीर आरोप मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आर्.टी.ओ.च्या) ‘https://transport.maharashtra.gov.in/1035/Home’  संकेतस्थळावरील तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या आदेशाद्वारे संमत करण्यात आलेला ३७ लाख ७४ सहस्र ६५७ रुपयांचा निधी प्रत्यक्षात त्यासाठी वापरण्यात आलेला नाही. ‘अ‍ॅप’ दुरुस्तीच्या नावाखाली संमत करण्यात आलेला हा निधी प्रत्यक्षात मात्र अन्यत्र फिरवण्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदु … Read more

आधुनिकता आणि चोख व्यवस्थापनात महाराष्ट्रातील ७ मंदिरे आघाडीवर !

धार्मिक पर्यटनास चालना देण्याची भूमिका ! – गिरीश कुलकर्णी, संयोजक, टेंपल कनेक्ट

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडर होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार संपादक श्री. आनंद रंगनाथन् यांनी काढले.